Wednesday, December 23, 2009

यमगरवाडी बद्दल थोडंसं!!

खरं तर सुरुवात कशी करावी ते कळत नाहीये आणि हा माझा लेख लिहिण्याकचा तसा दुसराच प्रसंग आहे....

भटके विमुक्तं विकास प्रतिष्ठातन (BVVP) गेल्या 14 वर्षांपासून विविध समाज प्रश्नां वर काम करते आहे. प्रतिष्ठारनच्याव विविध प्रकल्पांवपैकी यमगरवाडी प्रकल्पव (केशवनगर विद्या संकुल) हा महाराष्ट्राशत उस्मानाबाद जिल्ह्यात, तुलजापूरजवळ नांदुरी येथे राबवण्यात येतोय. हा प्रकल्पं 1993 मध्येण 18 एकर जागेवर श्री रमेश छटुफले यांनी दिलेल्या जमिनीवर 25 भटक्या  मुलांना घेऊन सुरु झाला. आज गिरीश प्रभुणे या कल्पाक आणि खंद्या कार्यकर्त्यामुळे यमगरवाडीला निवासी शाळा सुरु आहे. या शाळेत 400 मुले आणि 200 मुली शिकत आहेत. या शाळेत मुख्यित्वेम पारधी समाजातील मुले आहेत. या उपेक्षित समाजातील पालकांमध्येआ जागृतीचं काम करणं, त्यांहच्यात मुलांना एकत्र करुन शिक्षण देणं हे एक आव्हातनात्मचक कार्य आहे, जे गिरीश प्रभुणें करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच मी अहमदनगरला एका शिबिरात गेलो होतो आणि तिथं मला गिरीश प्रभुणे यांच्या  कार्याबद्दल माहिती मिळाली. त्यांाचं कार्य समजून बघणं, समजून घेणं आपल्याचला जमेल त्याक वेळात करायचं असं मी ठरवलं होतं.

आणि नेमकं 15 तारखेला माझा मित्र राजन याचा मला फोन आला की, “यमगरवाडी हा एक अनाथ मुलांकरता (पारधी समाजातील) प्रकल्पत चालतो. तेथील काही मुलांना दरवर्षी दिवाळीकरता पुण्यापत वेगवेगळ्या इच्छुरक लोकांकडे (2-2 किंवा 1-1 मुलांना) रहायला पाठवलं जातं. तर तू तुझ्याकडे एका मुलाला घेऊन जाशील का?” असा मित्राचा प्रश्नय ऐकताच मनात होकार देण्यााची खूप इच्छा् असूनही मी “नाही” म्हीटलं कारण मला त्यामच काळात वाईला जाणं आवश्य क होतं. त्यायवर तो म्हलणाला, “हरकत नाही मात्र ज्या‍वेळी या मुलांची सहल निघणार आहे त्याहवेळी या मुलांसोबत त्यांणच्याहकडे बघायला म्हजणून नक्कीस ये”. मी “हो” म्हेटलं.

सहलीला निघेपर्यंत माझी अशी कल्प्ना होती की असतील 20-25 मुलं. पण जेव्हाण 20 तारखेला आम्हीी सगळे रात्री एकत्र जमलो तेव्हाप मला कळालं की एक नाही दोन नाही तब्बाल 82 छोटी (43 मुलं आणि 39 मुली) मुलं होती. मला क्षणभर भीतीच वाटली की आता आपलं कसं होणार? एक तर लहान मुलाला सांभांळणं किती जिकिरीचं काम असतं. आणि आपला तर अशावेळी गोंधळच होतो, इथं तर 10-11 वयोगटातली ही मुलं, कसं सगळं सुरळीत पार पडणार ?

20 तारखेला मध्यारात्री 1 वाजता आमची सहल निघाली. सहलीला निघताना मुलं ज्यान पध्द तीनं ऐकत होती, सूचना पाळत होती, लहान मुलांची मोठी मुलं काळजी घेत होती ते सगळं पाहून माझी सुरुवातीची भीती पळाली आणि खात्री झाली की आता सहल छानच होणार. या मुलांमध्ये राहिल्यामुळे वयानं मोठ्ठे ही माझी संकल्परनाच बदलली. खरंच मोठं कोण? लहान सहान कारणांवरुन भांडणारी मोठी माणसं ? की दुस-याला आपला त्रास होऊ नये म्हलणून समजून घेणारी, समजूतदारपणे वागणारी ही लहान मुलं ? (सॉरी, खूप मोठ्ठी मुलं! )

आम्ही 21 तारखेला सकाळी चिपळूण येथे पोहोचलो. माझं हे स्पमष्टीवक्तेपपण कदाचित वाचणा-यांपैकी काहींना आवडणार नाही पण सहलीचं आयोजन चांगल्याा पध्दनतीनं केलं गेलं नाही हे लगेच प्रत्य‍यास आलं. कारण चिपळूणमध्येे कोणाकडे जायचं हेच नीटसं माहीत नव्हेत. आम्हीे अर्धा तास फिरत राहिलो. शेवटी चितळेहॉल शोधत एका ठिकाणी गेलो तर त्यां नाही काहीच कल्पधना नव्हणती. मात्र पाच मिनिटं या प्रकल्पाठवर बोलल्यागवर ते म्हटणाले, “मला काहीही अडचण नाही. तुम्हीं इथं थांबू शकता”. आणि त्यांलनी काही पुढं न बोलता पाणी तापायला ठेवलं. ब-याच माणसांना मदत करायची, चांगलं काम करण्यााची खूप इच्छाह असते पण काही वेळा ती मदत मागीतलीच जात नाही असंही मला वाटलं. तसंच कोणत्याी हॉलवाल्या नं 110 लोकांची सोय स्वततःची गैरसोय करुन केली असती?  आम्हाय सगळ्यांची त्यांकनी उत्तम व्यआवस्थाव केली.

हे सगळं होताच आम्हायला ज्या चितळ्यांकडे जायचं होतं त्यां चा अखेर पत्ता सापडला. आमच्याहतले निम्मेा लोक आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांनी आमची चहा-नाश्याहो  ची सोयही केली होती. पण त्यान चितळे (हॉलवाले) ना हे माहीतही नव्ह त तरी त्यांॉनी आमची सोय केली त्यां चा मला अभिमान वाटत होता. अर्थातच आम्हालला अभिप्रेत असलेल्या चितळेंनीही आमची उत्तम व्यअवस्था केली.

सर्व आवरुन आम्ही 11.30 ला शिवसृष्टीअदर्शन येथे जाण्यास निघालो. मी आणि योगेश यांनी 5 नम्बथर गटाची जबाबदारी घेतली. आम्हाला तसं पहाता काहीही करायचं नव्हमतंच. कारण आमच्या  गटात 10 जण होते आणि त्या‍तला अर्जुन हा 8 वर्षाचा मुलगा हा गटप्रमुख होता. लिडर म्हणजे काय, तो कसा सर्वांना समजून घेतो, सर्वांबरोबर सतत असतो, याचे धडे या लहान मुलांकडून घ्यातयला हवे. शिवसृष्टी दर्शन खूपच छान झाले. मला सारखं वाटायचं की आता ही मुलं गोंधळ घालतील आणि मग मला जरा काम मिळेल. पण नाहीच. संपूर्ण प्रवास मुलांनी गोंधळ केलाच नाही.

माझा स्वगतःबददलचा एक पक्का समज होता की आपल्याकला लहान मुलांसोबत अजिबात खेळता येत नाही, बोलता तर अजिबातच येत नाही. काही प्रमाणात हा समज खरा म्हणता येईल. आणि अनेकदा तसा अनुभवही आला आहे पण...

ही सहल इतकी वेगळी होती. दुपारी मी कागदाच्याक काही वस्तू  करायला सुरुवात केली आणि काय... लहान, मोठी सगळीच मुलं मला मला करीत एकच गोंधळ सुरु झाला. मला शिकवा, मला पण... अरे बापरे, कोणाकडेही न जाणारी ही मुलं, हातात कॅमेरा (कागदाचा) घेऊन माझ्याकडे धावत सुटली. पक्ष्यां चे पंख फडफडले आणि मुलांचा पुनश्चर गोंधळ सुरु झाला. कागदाच्याु कोल्ह्या ने मुलांची नाकं पकडली आणि मुलांच्याच चेह-यावर हास्य  पसरलं. ओरिगामी शिकवणा-या शाळेतल्याय बाई, माझे वडील, काका, काही मित्र, आणि अनिल अवचट या सर्वांचे मी मनातून खूप खूप आभार मानले. हॅट्स ऑफ!  की ज्यांभच्याचमुळे मी मुलांच्यात एवढ्या जवळ जाऊ शकलो आणि मुलंही यामुळं माझ्या जवळ आली.

पण वाईट गोष्ट अशी की माझ्याकडे पुरेसे कागद नव्होते. मला खूपच वाईट वाटलं. मी फक्त  काहीच मुलांना कागदाच्याव वस्तू. करुन देऊ शकलो. ज्यांनना मला हे देता आलं नाही त्या चं मला टोचणी लागलीच. पण हेही लक्षात आलं की या अनुभवातूनच शिकायचंय. अनुभवासारखा दुसरा गुरु नाही!

संध्यांकाळी 4 वाजता आम्ही समुद्रावर पोचलो. तिथं खूपच धमाल आली. माझ्यातला गुंडपणा उफाळून वर आला. मी एकेकाला धरुन सरळ पाण्यापत बुडवून काढलं. इतरांवरही पाणी उडवत राहिलो. मुलंही मस्तन मजा करीत होती. गुडघाभर पाण्या च्यार पुढं जायचं नाही ही सूचनाही तंतोतंत पाळत आनंद घेत होती. पोरं वाळूत मनसोक्तआ खेळत होती. शंख, शिंपले गोळा करीत होती. माझ्याकडे कॅमेरा नव्ह ता याचं मला अतीव दुःख त्याक्षणी झालं.

सूर्यास्त  तर अप्रतिम होता. इतर ठिकाणांपेक्षा हा सूर्यास्ति पहाणं म्ह णजे एक वेगळाच अनुभव होता. बस्सत, फक्त  बघतच रहावं, दूर दिसणा-या होड्या, उडणारे पक्षी, समुद्रात हळूहळू बुडणारा सूर्य आणि त्या्चा लालेलाल तेजस्वी पण बघता येइल असा गोल गोळा...व्वा!  काही गोष्टी तर शब्दाडत न पकडता येणा-या असतात....

तिथून मात्र आम्ही रत्नागिरीला मुक्काममाला पोहोचलो. तिथं मस्तम गरमागरम पुरीभाजी, शिरा, भात असं जेवण करुन ताणून दिली. रात्री डासांनी आमच्यारवर भरपूर ताव मारला ही गोष्टग निराळी.

दुस-या दिवशी म्हरणजे 22 तारखेला सकाळी आवरुन आम्हीव 11 वाजण्याच्या सुमारास भरपूर नाश्ता‍ करुन व सोबत जेवण घेऊन बाहेर पडलो. वेळणेश्वबर या प्रसिध्दन टेकडीवरील मंदिरामध्येव जाऊन दर्शन घेतलं. आजुबाजूला डोंगराळ भाग आणि मस्तत जंगलाचा परिसर होता. तिथून आम्हीस गणपती पुळे येथे जायला निघालो. मध्येस वाटेत एक बस बंद पडली. मग काय, तासभर वायाही गेला. रस्याग क त स्वाेमी स्वररुपानंद यांचं मंदिर होतं, तिथंही जाऊन आलो. गणपती पुळ्याला पोहोचलो तर उन प्रचंड पडलं होतं. आणि भूकही चांगलीच लागली होती. आणि समुद्रही एकीकडे खुणावत होता. पण आधी जेवण, मग थोडी विश्रांती आणि नंतर समुद्र असा प्राधान्यिक्रम ठरवून आम्ही  त्यादप्रमाणेच कृती केली.

मी तर समुद्रावर खूप फिरलो. पाण्या तून विचार करीत करीत इतका चालत गेलो की किती दूर गेलो आहोत याचा अंदाजच आला नाही. आत्ता असं लक्षात येतंय की समुद्राचं हे वैशिष्ट्य च असावं की त्या् पाण्यामतून आपण पुढे चालताना कळतच नसावं. कारण लाटा अलगद आपल्या  पायावर येतात, हळूवारपणे आपल्याा पायाखालून वाळू नेतात. परत एक नवीन लाट येते आणि तिच्याअसोबत थंडावा देणारी एक झुळूकही आणि त्याय येणा-या धुंदीतच आपण चालतच रहातो. कितिक वेळ...

जवळपास अर्धा तास चालल्यायवर मला आपण दूरवर आल्यासचं लक्षात आलं. तिथून मंदिर अगदीच छोटं दिसत होतं. आणि परतण्यासाठी फक्त 15 मीनिटं शिल्लक होती. हे लक्षात येताच मात्र मी पाण्याितून अक्षरशः पळत सुटलो. पण पाण्या तून सावकाश चालणं जेवढं आल्हाणददायक तेवढंच पळणं मात्र तापदायक...पण करतो काय ?

धापा टाकत परत पोहोचलो सगळी निघायच्या  बेतात होती. मी हुश्शत केलं आणि पुढच्यार वेळी घड्याळाकडे लक्ष ठेवायचं असं मनाला बजावलं. या सगळ्यात जेवण, विश्रांती गेली याचा मात्र जराही पश्चाणताप झाला नाही. कारण माझी ही समुद्रफेरी खूपच छान झाली. (हं बरोबर सोबत कोणी असतं तर अजून खूपच मजा आली असती हेही तितकंच खरं...)

आणि 5 वाजल्यांपासून परतीचा प्रवास सुरु झाला. जरासा कंटाळलोही. मात्र मला गाडी चालवणा-या ड्रायव्हलरकाकांचं खूपच कौतुक वाटलं. दोन दिवसात जवळपास 18-20 तास त्यां नी ड्रायव्हिंग केलं. एक रात्र तर संपूर्ण जाग्रण केलं पण जराही कुरकूर नाही की तक्रार नाही. उलट म्ह णाले, मुलांकडे बघून थकवा येतच नाही. उलट उत्साकह येतो. मी त्यां च्या शी चांगल्याेच गप्पाबही मारल्याव.

या संपूर्ण प्रवासात मी कितीतरी गोष्टीय शिकलो. काही शब्दाीत सांगता येतील आणि काही सांगताही येणार नाहीत अशा... नाव पुढे पुढे न करता नावाशिवाय कामं करणारी, श्रेय न घेणारी, काम महत्वा्चं मानणारी, मुलांच्या आनंदाकरता काम करायचं बाकी गोष्टींवचा बाऊ न करणारी माणसं बघितली. लहान वयात हेवेदावे, भांडणं विसरुन मोठी झालेली मुलंही बघितली. छोट्या छोट्या गोष्टीित आनंद मानणारी मुलं बघितली. आणि विचारात पडलो की आपण तर असं काहीच करत नाहीत. घरात 10-10 जोड कपडे असूनही दिवाळीत नवे कपडे घेतोच, मोठ्या भावाला जास्ती फटाके आणले म्ह,णून भांडणारे भाउ, फराळाला लाडू केले नाही म्हरणून आईवर चिडणारी मुलं हे सगळं कुठे आणि एक चॉकलेट मिळालं की आनंदात त्याआ चॉकलेटच्याम कागदाचीही वस्तू बनवण्याडस उत्सूक असलेली, कोणाच्यातरी कुशीत प्रेमानं झोपता आलं म्हंणून, प्रेमानं कुणी थोपटलं म्होणून आपल्याच ताई-दादांचं ऐकणारी, लहानलहान गोष्‍टींत सुख शोधणारी ही मुलं कुठे आणि...

पुढच्या  दिवाळीत कमीत कमी 5-6 मुलांना तरी मी माझ्या घरी घेऊन येणार हे नक्की, असं ठरवूनच मी सुखानं झोपेच्या स्वाधीन झालो. 

-सिद्धार्थ प्रभुणे

Tuesday, December 22, 2009

माहितीचा अधिकार आणि मी

ऑगस्‍ट 25, 2009, च्‍या दै. लोकसत्तामधील एक बातमी आली होती ‘धान्याधारित मद्यार्कनिर्मितीसाठी सरकारची खैरात; उत्पादनशुल्कात भरीव माफी’ बातमी वाचून धक्‍काच बसला. संत्र, द्राक्ष्‍यासारखी फळंही कमी पडली की काय म्‍हणून आता सरकारनं चक्‍क जीवनावश्‍यक धान्‍यापासून दारु बनवायचा घाट घालावा ? आणि ही प्रक्रिया स्‍वस्‍त व्‍हावी म्‍हणून दारु उत्‍पादकांना सरकारनं सबसिडीही जाहीर केली. रॉकेल, घरगुती गॅस, रासायनिक खतं, किटकनाशकं यांना सबसिडी देणं एकवेळ ठीक पण दारुला सबसिडी? कशासाठी ? तर म्‍हणे धान्‍यापासून दारु बनवणं हे मळीपासून दारु बनवण्‍यापेक्षा महाग असतं. आता उद्या सरकारनं सिगारेटलाही सबसिडी जाहीर केली तर त्‍यात आश्‍चर्य वाटायला नको. का तर यातून त्‍यांना महसूल मिळतो.





 धान्याधारित मद्यार्कनिर्मितीला प्रोत्साहन देण्‍याचा महाराष्‍ट्र सरकारचा निर्णय अत्‍यंत चुकीचा आहे हे कोणालाही पटेल. दारुमुळे बेचिराख, उध्‍वस्‍त होणारी माणसं, संसार दिसत असताना सरकारनं दारु निर्मितीला प्रोत्‍साहन देण्‍यासाठी सबसिडी द्यावी हे योग्य नाही. एका बाजूनं ग्रामपातळीवर दारुबंदी योजना मांडायची आणि दुस-या बाजूनं फक्‍त काही धनदांडग्‍या  राजकारण्‍यांच्‍या स्‍वार्थासाठी अशा प्रकारच्‍या योजनांना सबसिडी देउन त्‍यांना आणखी धनवान करायचं तेही सर्वसामान्‍यांच्‍या पैशातल्‍या करांतून हे पटत नाही.

ही सबसिडी देण्‍यामागची सरकारची भूमि‍का अशी आहे की, ‘गेल्‍या काही वर्षांमध्‍ये महाराष्‍ट्र राज्‍यात ज्‍वारीचं दरएकरी उत्‍पादन व ज्‍वारीच्‍या पिकाखालील एकूण क्षेत्रकमी होत आहे. या सबसिडीमुळे दारुच्‍या     निमित्ताने ज्‍वारीचं उत्‍पादन वाढेल व शेतक-यांना त्‍यांच्‍या मालाला योग्‍य  भाव मिळेल आणि विदर्भ-मराठवाडयातल्‍या शेतकर्‍यांच्या आत्‍महत्या कमी होतील.’ खरं पहाता, विदर्भ-मराठवाड्यातील ज्‍वारी, बाजरी इ. पिकांचे उत्‍पादन कमी असण्‍यामागे सिंचनाचा अभाव, नवीन तंत्रज्ञान, बी-बियाणे यांचा अभाव ही काही प्रमुख कारणं आहेत. द्यायची सबसिडी तर शेतक-यांना द्या. दारुउत्‍पादकांना का ?

तसंच धान्‍याधारित मद्यार्क निर्मितीतून किती प्रमाणात पिण्‍यासाठीची दारु व औद्योगिक वापरासाठीचे अल्‍कोहोल तयार व्‍हावे यावरही सरकारने काहीच नियंत्रण ठेवलेलं नाही. यावरुन हेच स्‍पष्‍ट होतं की सरकारमधील काही स्‍वार्थी राजकारण्‍यांसाठीच ही योजना साकार झाली आहे. सर्वसामान्‍यांना या योजनेपासून होणा-या दूष्‍परिणामांना तोंड द्यावं लागू नये यासाठी आपण एकत्रितपणे विरोध केलाच पाहिजे. आणि यासाठी आपल्‍या हाती एक मोठं शस्‍त्र आहे. ते म्‍हणजे माहितीचा अधिकार यानेके RTI !

माझा आरटीआयचा अनुभव ऐकायचाय?

सचिनच्‍या सांगण्‍यावरुन 7 नोव्‍हेंबरला मी धान्‍याधारित मद्यार्क निर्मितीच्‍या राज्‍य उत्‍पादनशुल्‍क विभागात आरटीआयचा अर्ज दाखल केला. मला अगदी मनापासून सांगावं वाटतं की अर्ज दाखल करताना मला आरटीआयविषयी काहीही माहिती नव्‍हती. त्‍या दिवशी पब्लिक इन्‍फर्मेशन ऑफिसर हे उपलब्‍ध नव्‍हते. मी अर्ज तर दाखल केला आणि वाटलं आता 30 दिवसांत कधीतरी उत्तर येईल. तत्‍काळ उत्तराची अपेक्षा नव्‍हतीच.

दोन-तीन दिवसानंतर एका सायंकाळी मला माझ्या मोबाईलवर माहीत नसलेल्‍या व्‍यक्‍तीचा मिसकॉल दिसला. कोणी केला असेल या कुतूहलापोटी मीही मिस कॉल पुनश्‍च त्‍या नंबरला दिला. आणि लगेच मला त्‍या नम्‍बरवरुन कॉल आला. ती व्‍यक्‍ती बोलत होती, “आपण वाकळे ना ? मी उत्‍पादनशुल्‍क विभागातून पब्लिक इन्फर्मेशन ऑफिसर पुजलवार बोलतोय. तुम्‍ही दाखल केलेल्‍या अर्जाविषयी बोलायचंय....” मी तर एकदम गोंधळूनच गेलो. इतक्‍या लवकर प्रतिसाद आणि तोही असा एकदम मोबाइलद्वोर म्‍हणजे मी कल्‍पनाही केली नव्‍हती.  कसंतरी स्‍वतःला सावरत मी त्‍यांच्‍याशी बोललो. आमची भेटीची वेळ ठरली. त्‍यांच्‍याकडे जी कागदपत्रं आहेत ती मी जरुर बघावी असंही त्‍यांनी सुचवलं.

सरकारी अधिका-याच्‍या या सौजन्‍यशील आणि तत्‍काळ प्रतिसादानं मी जाम सुखावलो. खरंतर त्‍यांचं अभिनंदनच केलं पाहिजे असंही मला वाटलं. आणि मी दुस-या दिवशी छानशी टवटवीत अशी दोन गुलाबांची फूलं घेऊन त्‍यांच्‍या भेटीला गेलो.

दुपारी एकच्‍या सुमारास मी त्‍यांना भेटलो. त्‍यांचं अभिनंदन केलं. मी देऊ केलेली फुलं त्‍यांनी मनापासून स्‍वीकारली. पुजलवार हे अधिकारी वयानं 40 ते 45 च्‍या आसपास असावेत. त्‍यांच्‍याकडील पद हे प्रभारी स्‍वरुपाचं होतं. त्‍यांनी सरळ मुद्याला धरुनच बोलणं सुरु केलं. ते म्‍हणाले, “तुम्‍ही विचारलेली सगळी माहिती आमच्‍याकडे उपलब्‍ध नाही ती मुंबई आणि कारखान्‍यांकडून मागवावी लागेल. पण सध्‍या काही प्रकल्‍पांची कागदपत्रं आहेत. ती तुम्‍ही पाहू शकता”.

मी त्‍यांनी दिलेल्‍या फाईल्‍स बघितल्‍या. त्‍यांनी दिलेल्‍या माहितीनुसार सध्‍या आदित्‍य ब्रेव्‍हरिजचं भेंडोळे इथे उत्‍पादन सुरु झालं आहे आणि प्रणव ऍग्रोटेक यांचंही उत्‍पादन सुरु होणार आहे.मी त्‍यांना सध्‍या उत्‍पादन घेत असलेले आणि मंजूरी मिळालेले कारखाने यांची कागदपत्रं मला हवी आहेत असं सांगितलं. तसंच उत्‍पादन सुरु नसलेल्‍याही कारखान्‍यांची कागदपत्रं मिळावीत असं सांगितलं. त्‍यांनी मला त्‍या कागदपत्रांच्‍या फोटोकॉपीज दिल्‍या.

माझ्याशी त्‍यांनी गप्‍पाही मारल्‍या. मी त्‍यांना लोकसत्तामधली बातमी दाखवली. पण त्‍यांनी विशेष उत्‍सुकता दाखवली नाही. येत्‍या 2-3 दिवसांत मी राहिलेली कागदपत्रं देतो असं त्‍यांनी सांगितलं. कामासंदर्भात ते काही वेळासाठी बाहेर निघून गेले.

त्‍यांच्‍या कार्यालयातील एक सहकारी धुमाळ यांच्‍यासोबत मी बसलो. मनात विचार करीत होतो, येताना नाही म्‍हटलं तर एक भीती घेऊनच मी आलो होतो. काय बोलायचं, काय मिळवायचं याचा हिशोब मनात करीत बसलो होतो. इतक्‍यात समोरनं दोन पोलीस आले आणि ते धुमाळांशी काही बोलू लागले. माझ्या मनात भीतीनं जास्‍तच ठाण मांडलं. मला एकाएकी 6 नोव्‍हेंबरला इंडियन एस्‍प्रेसमध्‍ये आलेली बातमीच आठवली. 42 harassed; many in jail for seeking into under RTI in Bihar… आठवून अंगाला कापरं सुटलं. वाटलं पुजलवारांनी हे पोलीस आपल्‍यासाठीच तर नाही ना पाठवले. पण ते सगळे माझ्या मनाचेच खेळ होते. पोलीस धुमाळांशी बोलून निघून गेले. आणि अर्ध्‍या तासानंतर मला राहिलेल्‍या कागदपत्रांची झेरॉक्‍स मिळाली. बाकी माहिती मला 2-3 दिवसांनंतर मिळेल असं त्‍यांनी सांगितलं हेातंच. मी निघताना झेरॉक्‍स कागदपत्रांच्‍या पैशांविषयी विचारणा केली. पण त्‍यांनी ते घेतले नाहीत. मी मिळालेल्‍या कागदपत्रांसहित बाहेर पडलो.

असा माझा आरटीआयचा अनुभव मजेशीर राहिला. मला त्‍यातून माहितीच्‍या अधिकाराविषयी बरंच शिकायला मिळालं. खरं सांगायचं झाल्‍यास माझ्यातल्‍या एका सामान्‍य नागरिकाला माहितीच्‍या अधिकाराची ताकद किती आहे याचा एक छानसा अनुभव आला.

अधिक माहितीसाठी: www.foodtoalcohol.wordpress.com

-अमोल वाकळे

Thursday, December 3, 2009

माणगावला भेट

गडचिरोलीतल्या रोजगार हमी योजनेच्या कामाच्या संदर्भात एखाद्या कार्यक्रमात लोकांना कसे सहभागी करायचे, संघटित कृती कशी घडवून आणायची, त्याच्या पद्धती काय असतात इत्यादी बाबत मनात विचारमंथन सुरु होते. सचिन तिवले याला नंदूरबार जिल्ह्यात पाणलोट क्षेत्र विकासाचे काम करतांना असेच काही प्रश्न पडत होते. उल्का महाजन ह्या रायगडातील काही तालुक्यांमध्ये लोक संघटनातून चांगले काम घडवून आणत आहेत अशी माहिती दत्ता बाळसराफ यांनी दिली आणि त्यांनी आमची तशी भेट आयोजित सुद्धा केली.

निर्माण फेलोशीपची कार्यशाळा संपवून सकाळी मी आणि सचिन पुण्याहून माणगावला निघालो. वाटेत ताम्हिनी घाट लागला. पावसाळा नुकताच संपलेला असल्यामुळे डोंगर हिरवेगार दिसत होते. घाटातनं प्रवास करत असतांना दोन वर्षांपूर्वी सायकलीवरुन केलेल्या पुणे ते रायगड अशा मुशाफिरीच्या आठवणी मनात जाग्या होत होत्या. गाडीच्या भरधाव वेगामुळे कधी कधी मनाला भीती वाटायची आणि ते (मनातल्या मनात!) ड्रायव्हरला ओरडून सांगायचे, “सावकाश रे बाबा! मला अजून जगायचं आहे. काही करुन दाखवायचं आहे.”
अकराच्या सुमारास सुखरुपपणे माणगावला पोहोचलो. टुमदार घरे न्याहाळत, चिखल तुडवत, रस्ता चूकत आम्ही ‘सर्वहारा जन आंदोलना’च्या कार्यालयात पोहोचलो. कुठेही संघटनेचे बोर्ड, बॅनर किंवा पोस्टर असं काहीचं दिसत नव्हतं. तीन खोलींच्या त्या कार्यालयात दोन कपाटं, एक लाकडी टेबल, काही खुर्च्या आणि स्वयंपाकघरातील काही भांडी असे मोजके सामान होते. मागाहून आम्हाला कळालं की संघटनेचं कार्यालय सुद्धा कायमस्वरुपी नव्हतं आणि संघटनेकडे स्वतःची अशी स्थावर मालमत्ता नाही. “आम्हाला त्याची गरजच वाटत नाही”, उल्काताई सांगत होत्या, “आर्थिक असुरक्षितता ही आमची ताकद आहे”. त्यांच्या मते जर संघटना लोकांसाठी काम करत असेल तर लोकच संघटनेला मदत करतील. (हा मुद्दा प्रचंड ‘वादनीय’ आहे.)

कार्यालयात हळूहळू कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली. त्या दिवशी ‘विधानसभा निवडणूकीत संघटनेची राजकीय भूमिका काय असावी’ या संदर्भात एक मिटींग आयोजित करण्यात आलेली होती. मिटींगला जवळजवळ ७० लोक उपस्थित होते. त्यात ४५ तरी महिला असतील. आदिवासी महिलाही पुढाकार घेऊन स्वतःची मतं मांडत होत्या. त्या कातकरी लोकांच्या चेहर्या वर उंचावलेला आत्मविश्वास (self confidence) तर बोलण्यात राजकीय कृतीशीलता (political activism) स्पष्टपणे जाणवत होती. मिटींग खुपच लोकशाही पद्धतीने झाली. उल्काताई स्वत: कमी बोलत होत्या (जे अनेक नेत्यांना जमत नाही.). संयमाने चर्चा घडवून आणत होत्या.

मिटींगच्या समारोपानंतर उल्काताईंशी बोलायला सुरुवात केली. सामाजिक, आर्थिक, राजकीय शोषणाविरुद्ध संघर्षात्मक काम ही कार्यपद्धती आधीच ठरलेली. जुन्या व्यवस्थेतील सरंजामी आणि नव्या बाजारु, भांडवली अर्थव्यवस्थेतील काही लुटारु प्रवृत्तींविरुद्ध त्यांचा संघर्ष सुरु आहे. त्यात मुख्यत: लोक संघटन, मोर्चा, धरणे, उपोषण, सत्याग्रह, राजकीय पाठींबा, विधीमंडळात प्रश्न उपस्थित करणे इत्यादी पद्धतींचा वापर असतो. शोषणासंबधीचे जसजसे मुद्दे येत गेले, त्यानुसार त्यांचे काम आकारास येत गेले. सुरुवातीलाच त्यांना किमान मजूरीचा प्रश्न महत्त्वाचा वाटला. लोकही त्या बाबतीत बोलायचे. प्रत्यक्षात तो प्रश्न हाताळतांना लोकसहभाग मिळालाच नाही. त्या कारणांचा शोध घेतल्यावर त्यांच्या लक्षात आले की जरी किमान मजूरीचा प्रश्न महत्त्वाचा असला तरी त्या प्रश्नाला इतरही सामाजिक, आर्थिक बाजू आहेत. तो ‘प्रक्षोभक’ मुद्दा लोकांना आणि संघटनेला सुद्धा अगदी सुरुवातीला पेलवणारा नव्हता. मग काही काळ लोकांमध्ये राहून, संवाद साधून दळी जमिनीचा महत्त्वाचा प्रश्न समोर आला. लोकांची ती महत्त्वाची गरज असल्यामुळे उल्काताईंना लोकांचा उत्स्फुर्त सहभाग मिळाला. त्यानंतर संघटनेला लोकांकडे कधी जावे लागले नाही. लोकच संघटनेकडे येवू लागले. प्रश्न निवडताना उल्काताईंची भूमिका स्पष्ट होती, प्रश्न जर लोकांना आपला वाटत असेल आणि जर लोक त्या प्रश्नावर काम करायला तयार असतील तरचं तो प्रश्न निवडायचा. लोकांच्या योग्य प्रश्नाला हात घालणे ही लोकसहभाग मिळवण्याची गुरुकिल्ली आहे असं जाणवलं.

लोक तुकड्या तुकड्यात आयुष्य जगत नसतात. लोकांचे प्रश्न गुंतागुंतीचे असतात. म्हणून लोकांना सहभागी करुन घेण्यासाठी त्यांच्या इतर आयुष्यात सुद्धा आपण सहभागी झाले पाहिजे अशी उल्काताईंची भूमिका. (We can’t see a problem in isolation.) ही भूमिका तत्व म्हणून बरोबर आहे. तिच्या व्यावहारिकते बद्दल मत मांडण्याइतपत मला अनुभव नाही.

या भूमिकेतून जमिनीचे प्रश्न, वनहक्काचे प्रश्न, रेशनिंग, दलितांचे प्रश्न, वेठबिगार, वीटभट्टी कामगारांचे प्रश्न इत्यादी शोषणविषयक विविध प्रश्न त्यांनी हाताळले. काही व्यक्तिगत तक्रार निवारणाच्या स्वरुपाचे प्रश्न सुद्धा हाताळले. असे काही प्रश्न हाताळतांना व्यापक परिमाण असलेले प्रश्न त्यांच्या लक्षात आले.

सर्वहाराचं काम जवळपास ७०० गावं आणि वाडयांमध्ये चालतं. विविध गावशिबिरांच्या माध्यमातून संघटना या गांवातील लोकांना संघटनेशी जोडून ठेवते. या गावशिबिरातील विषय आणि सत्र ही गावनिहाय बदलतात. “या शिबिरांची विशेषता म्हणजे ही शिबीर कृतीशील असतात” उल्काताई सांगत होत्या. “जर रेशनिंगच्या

प्रश्नावर शिबिरात पथनाट्य गावकर्यांशनी सादर केलं असेल तर त्या पथनाट्याचाच एक भाग म्हणून गावातील लोक रॅली करुन गावातील रेशनिंग दुकानावर जातात आणि त्या दुकानावरील तक्रार पुस्तकात आपली तक्रार नोंदवतात. अशा लहान-सहान कृती आम्ही शिबीरातच लोकांकडून करवून घेतो.”

उल्काताईंशी बोलतांना जाणवलं की लोकसहभागासाठी ठराविक, साचेबद्ध पद्धती (thumb rules) नसतात. लोकांशी संबधित वस्तुस्थितींचे योग्य आकलन मात्र अत्यंत महत्त्वाचे (अगदी निर्णायक म्हटले तरी चालेल) असते. निव्वळ लोकांशी संवाद साधून, प्रश्न विचारून लोकांच्या खर्या समस्या कळतातच असे नाही. लोकांचे प्रश्न गुंतागुंतीचे असतात. ते समजून घेण्यासाठी लोकजीवनात प्रत्यक्ष सहभाग, सहवास आणि सहकृती महत्त्वाचे ठरतात. सुक्ष्म निरीक्षण, आजुबाजूला घडणार्याच विविध घटनांचे अन्वयार्थ, आंतरसंबंध समजून घेणे, विश्लेषण करणे ह्यातूनच खर्यान समस्या कळू शकतात. निर्माण फेलोशीपच्या कार्यशाळेत आनंद करंदीकर सुद्धा म्हणाले होते, डोळ्यांना दिसणारी, वरकरणी खरी वाटणारी वस्तुस्थिती ही सहसा फसवी असते. खरी वस्तुस्थिती गुंतागुंतीची असते. म्हणून आपल्या आकलनाला वारंवार तपासून घेणे गरजेचे असते. ‘मला अतिंम सत्य समजले’ अशी गुर्मी आपल्याला चुकीच्या दिशेने नेते.

रायगड जिल्ह्यातील आठ तालुक्यात त्यांची संघटना काम करते. उल्काताई वगळता संघटनेतील बहुसंख्य कार्यकर्ते स्थानिक आहेत. प्रश्न सोडवतांना ते संघटनेशी जोडले गेले. १३ पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. गावपातळीवर गाव समिती, तालुका पातळीवर गावातील निवडक कार्यकर्त्यांची तालुका समिती, पूर्ण वेळ काम करणारी मुख्य कार्यकारिणी आणि सल्लागार मंडळ अशी संघटनेची रचना आहे. संघटनेशी जोडून घेण्यासाठी लोकांना तिचे सभासद व्हावे लागते. त्यासाठी २५ रुपये वार्षिक वर्गणी भरावी लागते. लोक संघटनेचे भागधारक (shareholder) आहेत. लाभार्थी (beneficiary) नाहीत. लाभार्थीच्या भूमिकेतून लोकांना बाहेर काढले की लोक सक्रिय होतात आणि लोकांचा सहभाग वाढतो असं दिसून आलं. हे अजून तपासून पहावं लागेल.

संघटनेची चिठ्ठी हे एक अजब प्रकरण आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्यावर झालेला अन्याय संघटनेसमोर मांडला तर संघटना समोरच्या पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी मिळावी म्हणून चिठ्ठी पाठवते. ती व्यक्ती पुढील चर्चेसाठी संघटनेच्या कार्यालयात स्वत: हजर होते. असे ९०% वेळेस घडते. यावरुन संघटना पर्यायाने लोक एक दबाव गट (pressure group) म्हणून यशस्वी ठरत आहेत असे दिसते.

उल्का महाजन या मूळच्या कोल्हापूरच्या. निर्मला निकेतन महाविद्यालयातील समाजकार्य अभ्यासक्रमाच्या सुवर्ण पदक विजेत्या. माणगावात कामाला सुरुवात केली तेव्हा त्या आणि त्यांची एक मैत्रिण अशा दोघीच होत्या. त्यांच्या आधी या भागात कुठल्याही प्रकारचे स्वयंसेवी काम झालेले नव्हते. त्यांना कुठलाही संस्थात्मक आधार सुद्धा नव्हता. सुरुवातीच्या काळात कातकारी लोक वर्षानुवर्षांच्या शोषणातून तयार झालेल्या अविश्वासामुळे त्यांच्याशी बोलायला सुद्धा तयार नसत. घरातनं पाणी सुद्धा मिळायचे नाही. तरीही त्यांनी माघार घेतली नाही.

त्यांच्या कामाच्या संघर्षात्मक पद्धतीमुळे हितसंबंध गुंतलेल्या अनेक बड्या व्यक्तींसोबत त्यांचा संघर्ष होत असतो. पण त्या कधी डगमगल्या नाहीत. त्या करत असलेल्या कामासाठी प्रचंड धैर्य आणि त्यागाची तयारी लागते. ‘मेरा क्या होगा’ हा व्यक्तिगत प्रश्न त्यांना कधी पडला असेल असं वाटत नाही.

स्वातंत्र्योत्तर काळातील चळवळींमधील कार्यकर्त्यांमध्ये विधायक काम की संघर्ष असा पेच असायचा. काही कार्यकर्ते ‘विधायक कामात संघर्ष नसतो असे कुणी सांगितले? आणि संघर्षात्मक काम विधायक असतेच की’ अशी भूमिका घेत. जागतिकीकरणाच्या, ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेच्या आजच्या युगात सामाजिक परिवर्तनाच्या संकल्पना बदलत आहेत. अशा काळात संघर्षात्मक कामाची नेमकी भूमिका काय ह्याचा शोध घ्यायला हवा. एखादी जुनी, कालबाह्य किंवा शोषणावर आधारित व्यवस्था बदलण्यासाठी लोकसंघटनातून संघर्ष आवश्यक ठरतो का? की नवी व्यवस्था इतकी शक्तिशाली आणि क्रांतिकारी असते की जुनी व्यवस्था कालबाह्य ठरुन आपोआप गळून पडते?

रोजगार हमीच्या कार्यक्षम अंमलबजावणीसाठी ‘लोकसंघटनातून संघर्ष’ या कामाच्या पद्धतीतून काही गोष्टी निश्चित घडवून आणता येतील. पण त्या अपूर्याू ठरतील. जोवर रोहयोच्या अंमलबजावणीसाठीच्या व्यवस्थेत काही मूलभूत बदल होत नाही तोवर रोहयोची कार्यक्षमता वाढणार नाही. ज्ञानाचा-तंत्रज्ञानाचा वापर करुन रोहयोची अंमलबजावणीची व्यवस्था कित्येक पटींनी कार्यक्षम करता येणे शक्य आहे. मात्र रोहयोला लोकोपयोगी बनण्यासाठी सामान्य माणसाचा योजनेतील सहभाग वाढलाच पाहिजे. तिथे सुद्धा ज्ञान – तंत्रज्ञानाधारित साधनांचा प्रभावी उपयोग करुन घेता येणे शक्य आहे असे रोहयोच्या अनुभवावरुन मी सांगू शकतो.

वेळेअभावी मनातले अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले. त्यांच्यासोबत पुढे चालू राहणार्‍या संवादातून कदाचित उत्तरे सापडतील.

-गोपाल महाजन , सचिन तिवले

Monday, November 23, 2009

प्रतिक्रिया

दि. 17 नोव्हेंबर, 2009 रोजी लोकसत्ता मध्ये प्रकशित झालेल्या ‘ह.भ.प. बबनरावांना ‘मोह’ अनावर !’ या बातमीला प्रतिक्रिया म्हणून लिहलेला हा लेख.


---------------
पोषण नको फक्त व्यसन द्या!!!

पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारने आदिवासी भागांमध्ये मोहफुलांपासून दारु निर्मिती करण्याचा घाट घातला आहे. पण यावेळी त्याचं ‘कोलीत’ मात्र बबनराव पाचपुत्यांच्या हातात दिलं आहे. आदिवासी विकासाचं खातं हातात आल्या आल्या त्यांनी मोहफुलांपासून दारू निर्मितीची घोषणा ‘हर्बल लिकर’ या गोंडस नावाखाली नुकतीच जाहीर केली.

यापूर्वीचं गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मंत्रीमहोदय आत्राम यांनी गडचिरोलीत मोहफुलापासून दारू निर्मितीचा कारखाना काढणार असल्याचं जाहीर केलं होत. पण गडचिरोली जन-आंदोलनाद्वारे दारूमुक्त करणारे डॉ. अभय व डॉ. राणी बंग, सेवानिवृत्त न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, चंद्रपूरचे माजी खासदार व राज्यामंत्री श्री. शांताराम पोटदुखे, तसेच स्थानिक नेते व बचत गट यांनी केलेल्या जाहीर विरोधामुळे आपण आशा प्रकारच्या कोणत्याचं प्रस्तावाचा विचार करत नसल्याची सारवासारवं शासनाने त्यावेळी केली. कदाचित हातातोंडाशी आलेल्या निवडणुकीच्या काळात ‘जनमता’चा आदर करत असल्याचा धूर्तपणा शासनाने त्यावेळी दाखवला असावा. आता मात्र हे प्रकरण नव्याने डोकं वर काढत आहे.

किमान पाचपुते साहेबांनी आदिवासी विकास खातं हाताला लागल्यानंतर ज्याच्या विकासाचं ‘परमिट’ आपल्याला मिळालय़ं तो आदिवासी कोण, कुठला, काय करतो, कसा जगतो याची माहिती आपलं (की आदिवासींचं) शंभर दिवसांचं ‘टारगेट’ ठरविण्यापूर्वी मिळवायला हवी होती. तसं केलं असतं तर त्यांनी हा निर्णय नक्कीचं घेतला नसता. कारण त्यांना वाटतं त्याप्रमाणे आदिवासी फक्त मोहफुलांपासून दारू काढत नाही, तर आदिवासी मोहफुलांवर आपली भूक भागवतो, मोहफुलं वाळवून साठवूण ठेवतो, आदिवासी बाया मोहफुलांची भाजी बनवतात, मोहफुलांचा भाकरीच्या पीठामध्ये वापर केला जातो. मोहफुलांच्या वापरातून आदिवासींना अनेक पोषणतत्त्वे मिळतात. म्हणूनचं मोहाला आदिवासी मोहामाऊली म्हणतो या गोष्टी त्यांना ज्ञात झाल्या असत्या. एवढचं नव्हे तर मोहाचा संधीवात, बद्धकोष्ठता, मूळव्याध, डोकेदुखी, मधूमेह व स्नायुंवरील ताण कमी करणे या व्याधींवर आयुर्वेदामध्येदेखिल वापर सांगितला आहे.

अशाप्रकारे ‘एक महू, त्याचे गुण बहू’ अशा आदिवासींच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनात महत्त्वाचे स्थान असणार्याच मोहच्या फुलांपासून होऊ घातलेल्या दारू निर्मितीच्या कारखान्यामुळे झालेच तर आदिवासींचे नुकसानच होईल. सर्व मोहाची फुलं दारू कारखान्याकडे वळवली जातील. आदिवासी मोहाच्या इतर फायद्यांपासून वंचित होईल. मुळातचं कुपोषित असलेला हा वर्ग अधिक कुपोषित होईल. नंदुरबारसारख्या जिल्ह्यात तर सातपुड्यातील सारं जंगल आपण याअगोदरचं आदिवासींकडून ओरबाडून घेतलं आहे. एकही साग आपण तिथे शिल्लक ठेवलेला नाही. आता तर धार्मिकविधीच्या निमित्ताने आदिवासींनी जपून ठेवलेली मोहाची झाडंदेखिल ‘आम जनता की सरकार’ आदिवासींसाठी ठेवणार नाही. त्याची दारू बनवून ती तिथे आदिवासीच्याच गळी उतरवली जाईल आणि मोठ्या प्रमाणात शहराकडे पाठविली जाईल.

या कारखान्यामुळे मोहाची दारू आदिवासी भागात विपुल प्रमाणात उपलब्ध होईल. जागतिक आरोग्य संघटनेच्या निष्कर्षानुसार समाजातील दारुच्या उपलब्धीच्या प्रमाणात समाजातील दारुड्यांची संख्या व व्यसनाचे प्रमाण वाढते. त्यानुसार आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात या कारखान्यांमुळे विनाशाकडे लोटला जाईल. शासनाला जर आदिवासींचा विकास करायचा असेल, त्यांना रोजगार मिळवून द्यायचा असेल तर मोहफुलांतील पोषणमूल्यांवर आधारित उत्पादने बनवण्यासाठी त्यावरील अधिक संशोधनासाठी शासनाने प्रयत्न करावेत. दारू कारखान्यांव्यतिरीक्त इतर उद्योगांना प्रोत्साहन द्यावे.

माजी पंतप्रधान, स्व. इंदिरा गांधी यांनी पुढाकार घेऊन 1975 मध्ये बनविलेल्या केंद्र शासनाच्या ‘आदिवासी भागांसाठी दारूनीती’ या निर्देशांकानुसार देशाच्या कोणत्याच आदिवासी भागामध्ये दारुची निर्मिती किंवा विक्री करु नये. स्व. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना 1977 मध्ये महाराष्ट्र शासनाने ही नीती स्विकारलेली आहे. असे असताना मोहफुलांपासून दारू बनविण्याचा निर्णय घेऊन बबनरावांनी इंदीरा गाधींची ही नीती सोईस्कररीत्या बासनात बाधून ठेवली आहे.

यापूर्वीच एका ‘रावां’नी द्राक्षापासून वाईन बनवून, ‘वाईन ही दारू नाहीच’ असे महाराष्ट्रातील शाळकरी मुलांपासून ते साठी ओलांडलेल्या नागरीकांना शिकविलेले आहे. आता हे नवे ‘राव’ मोहाची दारू म्हणजे दारू नव्हे हर्बल लिकर आहे असं सांगून महाराष्ट्रातील दहा कोटी जनतेच्या गळी उतरविण्याच्या विकासाच्या योजना आखत आहेत. यापूर्वीच शासनाने धान्यापासून दारू निर्मितीला प्रोत्साहन म्हणून कोट्यावधीं रुपयांची सबसिडी दारू उत्पादकांना वाटण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही वर्षातील ही ध्येयधोरण बघता ‘जनतेला धान्य नको, पोषण नको फक्त व्यसन द्या’ ही नीती शासनाने स्विकारली आहे असं दिसत आहे. याउपर तुम्ही मात्र ‘घ्या’ आपण मात्र बिलकुल घेत नाही असं धूर्तपणे सांगायला राव मात्र विसरत नाहीत.

-सचिन

Monday, November 9, 2009

Ecofest 09


7 आणि 8 नोव्हेंबर 2009 ला काही उत्कृष्ट लघु चित्रपट बघण्याची संधी मिळाली. फोलिएज या संस्थेनी आयोजित केलेल्या इकोफेस्ट या पर्यावरण विषयक लघु चित्रपट स्पर्धे निमित्त.
Do You… ?
मोजून 59 सेकंदांचा हा अनुभव. सहज आपल्याला कृतीशील होण्यास उद्युक्त करणारा. जे कळतंय ते वळण्यासाठी काय करायचे असा नेहमीच प्रश्न पडतो. पर्यावरणाच्या अवाढव्य अशा प्रश्ना बद्दल आपल्याला आता माहिती आहे, सगळं कळत आहे पण तरीही वळत नाहिए. तर हे कळल्यापासून कृतीपर्यंत नेण्य़ासाठीचा एक मार्ग या चित्रपटामुळे शिकलो. आणि तो म्हणजे अगदी सहज पणे आपल्याला हृदयाला साद घालणारे भावनिक आव्हान. याला आपले हृदय प्रतिसाद देते आणि आपल्या बुद्धीला, आळसाला आणि प्रश्नाच्या भव्यतेमुळे आलेल्या अगतिकतेला बाजूला सारून मी काहीतरी करणार, मला जे येतं त्यापासून सुरुवात करणार इथपर्यंत पोहोचवते. केवढी ताकत आहे आपल्याच हृदयात.
संयोग मोहिते यांनी केलेल्या या लघु चित्रपटाला पहिले बक्षीस मिळाले.
Vanishing Vultures
तीन दशकांपूर्वी अंदाजे 8.5 कोटी गिधाडे भारतात होती. आता केवळ 3 ते 4 हजार एवढीच यांची संख्या आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात यांची घट कशी काय झाली याबद्दल सांगणारा हा चित्रपट. 2002 साली पेरिग्राइन ट्रस्ट या संस्थेला पाकिस्तानात संशोधन करत असता असे समजले की याचे कारण डायक्लोफिनॅक (diclofenac) हे रसायन. याचा anti-inflammatory परिणाम जनावरांच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. अशा जनावराच्या मृत्यु नंतर जर गिधाडांनी याचे भक्षण केले तर त्यामुळे विसेरल गौट (visceral gout) तयार होऊन गिधाड मरण पावते.
2006 मध्ये भारत सरकार ने निर्णय घेतला की जनावरांसाठी वापर करण्यासाठी डायक्लोफिनॅकचा वापर बंद व्हावा. यासाठी पर्याय म्हणून मेलॉक्सिकॅम (meloxicam) नावाचे रसायन वापरले जाऊ शकते. याच बरोबर गिधाडांची संख्या वाढवण्यासाठी केंद्रे स्थापन करण्यात येत आहेत. याची अम्मलबजावणी कशी होते यावर आता गिधाडांचे भवितव्य अवलंबून आहे.
एका रसायनामुळे एक अख्खी प्राणीजातच नष्ट होऊ शकते हे भीषण वास्तव आहे. या बाबतीत आपण त्याचा थेट संबंध लावू शकलो म्हणून त्यावर मार्ग सापडला. अशी किती रसायने आपण वापरतो आणि त्यामुळे कोणत्या प्राण्यावर काय काय परिणाम होत असतील कोणास ठाऊक. सध्या बीटी वांग या विषयावर चर्चा चालू आहे. अशा नवनवीन तंत्रज्ञानाचा कशावर कसा परिणाम होईल कोणास ठाऊक? नवीन तंत्रज्ञान कधी आणि कसे स्वीकारायचे हे आजच्या जगासमोरचे कठीण आव्हान आहे.
The Ridley’s Last Stand
ओरिसा मध्ये बंदर बांधण्याविरुद्ध इमेल पेटिशन कदाचित तुम्हाला आले असेल. मलाही आले होते. टाटांच्या या प्रकल्पामुळे रिडली कासवांना धोका आहे एवढेच माहिती होते. पण त्या कासवांची कहाणी कुठे माहित होती.
ओरिसा च्या सागर किना-यावर दर वर्षी एक चमत्कार घडतो. दूर श्रीलंकेच्या दक्षिण भागातून हजारोच्या संख्येनी रिडली कासवे हजरो कोलोमिटरचा प्रवास करत येतात. पाण्यामध्येच मेटिंग करून मादी जमीनीवर अंडी घालायला येते. अंडी घालून निघून जाते. काही दिवसांनी लाखो कासवे अंड्यातून बाहेर येतात आणि पाण्याच्या दिशेनी चालत जातात. मादी अंडी घालताना चे चित्रिकरण शेखर दत्तात्रे यांनी केले आहे. अंड्यातून बाहेर आल्यावर या लहान लहान कासवांच्या सागरात बसून या नैसर्गिक चमत्काराचेही चित्रीकरण फार सुंदर आहे. एक सागर दुस-या सागराला जाऊन भिडतो आहे असा भास होतो.
परंतु मासेमारीमुळे कासवांचे भवितव्य धोक्यात येत आहे. मोठ्या जाळ्याचा उपयोग केल्यामुळे त्यात कासवेही अडकतात व मरण पावतात. Turtle Excluder Device (TED) या उपकरणाचा उपयोग जाळ्यात केला तर कासवे यातून सुटू शकतात. कासवासोबत 5 टक्के माशांनाही सुटका मिळते. परंतु या 5 टक्के तोटाही सहन करण्याची कंत्राटदारांची तयारी नाही. या प्रश्नाचे इतरही पैलू आहेत. जसे की किना-यावार केलेली कॅशुरीना ची लागवड. किनार्‍याचा परिसर जर सपाट नसेल आणि त्यात छोटे आडथळे जरी असले तरी नुकत्याच जन्म झालेल्या कासवांना ते ओलांडून सागरापर्यंत पोहोचता येत नाही. जवळच्या परिसरात दिवे असतील तर पिल्ले दिव्याच्या दिशेनी जातात आणि पाण्यापर्यंत न पोहोचल्यामुळे मरून जातात.
हा प्रश्न सोडवण्यासाठी देखील अनेक नियम बनवले गेले आहेत. पण अम्मलबजावणीतच सगळं गाडं आडतं.
Shores of Silence – Whale Sharks in India
गुजरातच्या किनार्‍यावर व्हेल शार्क हा मासा वर्षातील काही काळ येतो. हा विशाल मासा 35 फूट लांबी पर्यंत वाढू शकतो. एवढा मोठा मासा पण छोटे छोटे प्लँक्टन मासे खाऊन जगतो. या माशाच्या लिव्हर पासून जे तेल मिळते त्याची बाजारात विक्री केली जाते. परदेशात हा मासा खाण्यातही वापरला जातो.
यात सर्वात क्लेशकारक असा प्रसंग म्हणजे या माशाची शिकार करण्याची पद्धत. यासाठी फारच साधी उपकरणे वापरली जातात. एक दोरी, एक आकडा (हुक) आणि दोन हवाबंद प्लॅस्टिक्ची पिंप. हे मासे वरच्या भागत असतात आणि सहज दिसतात. वरच्या थरातल्या गरम पाण्यात आणि उन्हात न्हात बसलेले असतात. मासा दिसला की आधी आकडी टोचतात. आकडीला दोरीनी दोन पिंप लावलेली असतात. आकडी लागताच मासा घाबरून खोल जातो. पण हवाबंद पिंप त्याला सतत वर खेचत राहतात. शेवटी थकून मासा वर येतो. मग त्याच्या शेपटीला दोरीनी बांधून किनार्‍यावर ओढून आणतात आणि मरेपर्यंत वाट बघतात.
हा लघुचित्रपट बनवण्यासाठी या प्रश्नाच्या विविध पैलूंचा माइक पांडे यांनी अभ्यास केला आहे. स्थानिक लोकांसोबत शिकारीला जाऊन, पॅट्रोल बोटीत कोस्ट गार्डच्या लोकांसोबत, मासा मारल्यानंतरची प्रक्रिया, लिव्हर पासून तेल बनवण्याची प्रक्रिया या सर्वाचे चित्रिकरण केले आहे.
2001 साली व्हेल शार्क च्या शिकारीवर बंदी आली. यामुळे रोजगार गमावलेल्यांना हेच व्हेल मासे दाखवून पर्यटनानून रोजगार मिळवून देण्याचे प्रयत्न चालू आहेत असे नेट वरून समजले.
आयोजना बद्दल
फोलिएज च्या आयोजनही उत्तम होते. कार्यक्रम वेळेत सुरू झाला. मुळात अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करणे हीच एक उत्तम कल्पना आहे. पर्यावरणाबद्दल काम करत याची व्यवहारीक बाजू कशी सांभाळतात हे समजून घ्यावे लागेल. स्पर्धेतील चित्रपटांची सीडी बनवून ती कागदाच्या पिशवीत सर्वांना दिली. कार्यक्रमादरम्यान चहा कॉफी नव्हती :) त्यामुळेही भरपूर प्लॅस्टिक कप वाचले असतील. आपल्याला कधी उगीचच चहा कॉफी प्यायची सवय लागली आहे.
पडलेले प्रश्न
1. या सर्वच प्रश्नांच्या बाबतीत असे जाणवले की पर्यावराबद्दल जागृत असलेले लोक भरपूर प्रयत्न करून, सरकार वर दबाव आणून नियम बदलून घेतात. यात भरपूर वेळ, परिश्रम घ्यावा लागतो.  त्यानंतर जी सक्त अम्मलबजावणी करावी लागते त्यावर मात्र आपले काही नियंत्रण नाही. इतर सर्वत्र जाणवते ती कमजोर कडी इथेही जाणवते.
2. पर्यावरणाच्या प्रश्नांशी जेव्हा स्थानिक लोकांचे पोट अवलंबून असते तेव्हा काय करायचे? याला पर्याय शोधावाच लागतो आणि तो सापडतोच असे नाही.
3. आपल्या जीवशैलीचा पर्यावरणाच्या हानीशी आपण थेट संबंध लावू शकत नाही आणि म्हणून मला समजतही नाही की मी काय करू. जसे की व्हेल शार्क वाचवण्यासाठी मी काय करू? या प्रश्नांशी थेट संबंध लावता आले पाहिजे.  
या निमित्तानी Wild Life संबंधित डॉक्युमेंट्री हे नवीन विश्व उघडले. त्यात किती परिश्रम घ्यावे लागतात. माइक पांडे यांनी व्हेल्स वर 3 वर्ष डॉक्युमेंट्री बनवत होते. आणखीन म्हणजे खूप लोक या विषयी संवेदनशील आहेत. हे सगळे एकत्रित कसे आणायचे या दिशेनीही प्रयत्न केले पाहिजेत.   

-प्रियदर्शन

Wednesday, November 4, 2009

पडसाद

काल सायंकाळी मेधातांईना प्रत्यक्ष ऐकायला मिळालं. निमित्त होतं The Word’s First Anti-Dam Movement या प्राध्यापक वोरा लिखित पुस्तकावर फर्ग्युसन कॉलेजच्या राजशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या चर्चेचं. ‘धरण, धरणग्रस्तांचे प्रश्न आणि त्यासंदर्भातील चळवळी काही आपल्याला नवीन नाहीत’ कार्यक्रमाच्या सुरवातीला सुहास पळशीकर सांगत होते. जगामध्ये अशा प्रकारच्या चळवळी विविध स्तरावर चालू आहेत. पण जगात प्रथमचं अशा प्रकारच्या चळवळींची सुरुवात पुण्याच्या मुळशी धरणापासून सुरु झाली. त्यापूर्वी धरणग्रस्तांच्या तक्रारी होत्या पण धरणग्रस्तांनी संघटीतरीत्या आपली राजकीय भूमिका मांडणारा लढा प्रदीर्घ काळ लढल्याची नोंद इतिहासात नाही. हा मुळशीचा लढा लढला गेला होता १९२१ ते १९२४ च्या कालवधीत टाटा उद्योगसमूहाच्या विरुद्ध. त्याचं नेतृत्व केलं होतं सेनापती बापटांनी.

या लढ्याला गांधी समुदायाने फारसा पाठिंबा दिला नव्हता, परंतु गांधीजींनी मुळशी प्रकल्पाचं समर्थनसुद्धा केलं नव्हतं. लोक़ांच्या विरुद्ध भूमी संपादन करुन असे प्रकल्प उभे करणं याला गांधीजींचा विरोध होता.

मेधाताईंनी मुळशीचा लढा, नर्मदा बचावं आंदोलन, अशा जनाआंदोलनांच स्वरूप आणि त्यांचे परिणाम याची आपल्या भाषणातून अतिशय सुंदर मांडणी केली. मुळशीच्या आंदोलनाच्या माध्यमातून जरी मावळ प्रांतातले शेतकरी जरी टाटांना या प्रकल्पापासून परावृत करु शकले नसले तरी ते आंदोलन अयशस्वी झालं असं म्हणता येणार नाही. “कोणतही जनाआंदोलन हे यशस्वी की अयशस्वी असं सरळ सरळ मोजता येत नाही.” मेधाताई सांगत होत्या. जनाआंदोलनातून समाजाला एक नवीन विचार मिळतो, तो व्यापक असतो आणि त्यातून राज्यसंस्थेची सुद्धा घडण होतं असते.

मुळशीच्या निमित्ताने काही मुद्दे समोर आले. राष्ट्रीय सुरक्षितता धोक्यात असताना किंवा राष्ट्रावर एखादी नैसर्गिक आपत्ती आली असताना राष्ट्र लोकांकडून कोणत्याही गोष्टींची मागणी करू शकते पण मुळशीच्या संदर्भात असं काहीचं नसताना सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या जमिनी कशाच्या आधारावर बळकवल्या जाऊ शकतात. शेती, शेतकरी आणि त्यावर आधारलेली अर्थव्यवस्था कि धरण, उद्योगधंद्यांना लागणारी वीज, त्यातून एका विशिष्ट वर्गाला होणारा फायदा यापैकी काय महत्वाचं आहे असे प्रश्न पहिल्यांदा उपस्थित केले गेले.

मुळशी नंतर सुरु झालेल्या आणि अगदी आतापर्यंतच्या नर्मदा बचाव आंदोलनापर्यंतच्या गेल्या काही वर्षातील चळवळींकडे पाहता, धरणग्रस्तांनी व त्यासंदर्भात काम करणार्‍या चळवळींनी फक्त आमच्या पुनर्वसनाचे काय? हा एकमेव प्रश्न उपस्थित केला नाही तर अर्थशास्त्राच्या दृष्टीकोनातून धरणं खरीच “फायद्याची” ठरत आहेत का? धरणांमुळे दुष्काळाचा प्रश्न खरचं सुटतो का?. पर्यावरणाच्या दृष्टीने धरणांचं स्थान काय? इथून ते विकासाची खरी व्याख्या काय असावी? विकासाचं नवं ‘मॉडेल’ कसं असावं? विकास प्रक्रियेत लोकसहभाग किती व कसा असावा? सामाजिक संपात्तिचा वापर, पुनर्वापर व त्याच न्याय पद्धतीने समवाटप कस असावं? ते पैशाच्या बळावर वाढलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या बेसुमार वापर करुन रुजू पाहणार्‍या उपभोग्तावादावर नियंत्रण असावे का? असे मूलभूत प्रश्न उपस्थित केले. या चळवळींनी यापैकी काही प्रश्नांवर अभ्यास केला आणि विकासाचे पर्यायी मार्गसुद्धा काही बाबतीत सुचवले. या पुस्तक चर्चेच्या निमित्ताने मेधाताईंनी या मुद्यांवर त्यांच्या ‘खास’ शैलीत विस्तृतपणे बोलल्या.

असं असतानादेखिल नंदीग्राम, सिंगुर, एसईझेड हे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आजही तितकेच तीव्रतेने आपल्यासमोर आहेत. माओवाद्यांचे प्रश्न जे अप्रत्यक्षपणे या प्रश्नांशी निगडीत आहेत. वेगवेगळ्या उद्देशांसाठी, वेगळ्या मार्गांनी होणार्‍या भूसंपादनातून निर्माण होणारे प्रश्न. हे प्रश्न आजही पुरेश्या सहृदयतेने हाताळले जात नाहीत. हे कदाचित उद्योजकांचे वाढते प्रस्थ, नोकरशाही आणि स्वार्थी राजकारणी यांमुळे घडत असावं. अशा परिस्थितीत सर्वसामान्य जनतेचा या प्रश्नांमध्ये सहभाग व त्यांची कृती अधिक महत्त्वाची आहे याची जाणीव झाली.

या महिन्याच्या सुरवातीला उल्का महाजन आणि सर्वहारा जनआंदोलनाची कामे पाहिल्यानंतर, गेल्या आठवड्याभरात बीटी वांग्याबद्दल झालेली चर्चा व त्याला विविध माध्यमातून व स्तरातून जनतेने केलेला विरोध बघितल्यानंतर जनाआंदोलनाचं महत्त्व पुन्हा एकदा माझ्या प्रत्ययास आलं.

खरं काय हे एकदा माहीत झाल्यानंतर आणि ते सरळ सरळ विवेकबुद्धिला पटत असताना देखिल काही विशिष्ट गटाच्या/ वर्गाच्या हितसंबधापोटी जर त्या गोष्टी प्रत्यक्षात येत नसतील तर अशावेळी सर्वसामांन्याची भूमिका महत्त्वाची ठरते. निवडणुकांव्यतिरीक्त ‘आम’ जनतेला विविध मुद्द्यांवर आपली मतं दखल घेतली जातील अशा पद्धतीने मांडण्यासाठी व व्यक्तिगत वा लहान गटांमधून कृती करता येईल अशी व्यासपीठं किंवा संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्याचे नवनवीन मार्ग शोधण्याची गरज आहे.

असं घडून आल्यानंतरच विवेक सावंत यांनी सांगितल्याप्रमाणे बदल घडून येण्याच्या प्रक्रियेतील ज्या Information, Interaction, Transaction आणि Transformation या चार पायर्‍या आहेत, त्यातील Interaction आणि Transaction या पायर्‍यांना गती मिळेल.


-सचिन

Monday, November 2, 2009

लहानपण देगा देवा


रात्री दहाच्या सुमारास अर्पिताला फोन केला. अनेक दिवसांनी तिच्याशी बोलत होतो. सहज बोलता बोलता जीवनाच्या निरर्थकतेविषया बोलणे चालू झाले. नुकतेच माझ्या आजीशी बोलत असताना मी तिला विचारलं की हे शरीर जर निरर्थक असेल, आत्मा जुन्या कपड्यांसारखा जर ते बदलत असेल तर मग लागतेच कशाला शरीर. आपण सर्व आत्मेच का नसतो? तेव्हा तिनी मला शंकराचा-यांची गोष्ट सांगितली. शंकराचार्य या भौतिक जगाला माया म्हणत. एकदा रस्त्यातून जात असता त्यांच्या मागे एक हत्ती लागला. तो जवळ आला अन् शंकराचार्यांनी धूम ठोकली. हे बघत असलेल्या त्यांच्या मित्रानी त्यांना बरोबर विचारले की हा हत्ती जर माया असेल तर मग तुम्ही का पळालात. तेव्हा शंकराचार्य म्हणाले, की हा हत्ती माया आहेच आणि मी पळालो ती देखील माया होती. अर्पिता आणि मी पाच एक मिनिटे फोन वर हसत होतो. कितीतरी दिवसांनी मी इतका हसलो.

आता झोपावे अशा विचारात होतो आणि जवळच्या मार्केटयार्ड मधल्या गणपती मंदिरातून भजनाचे स्वर आले. घरापासून या मंदिराचे हवेतील अंतर अंदाजे 500 मीटर असेल. मंदिराच्या वरच्या भागात 4 भोंगे लावले आहेत. तिथून थेट आवाज आमच्या सोसायटीत येतो. घरात जो आवाज येतो त्याचा त्रास होतो. हे गाणे अनेकदा बेसूर असते. शब्द तर समजत नाहीतच. तेव्हा रात्रीचे 10:30 वाजले होते. पहिल्यांदा 100 वर फोन केला. नेहमीप्रमाणेच गाडी पाठवतो असे उत्तर मिळाले. गाडी जाणार नाही हे अनुभवातून माहित होते. तरीही फोने केलाच पाहिजे, किमान त्याची नोंद तरी होते या विचाराने मी नेहमी 100 वर फोन करतो.

खाली उतरलो आणि माझी आत्या, शांति आत्या अपेक्षेप्रमाणे त्रस्त होतीच. तिल म्हटलो की आपण जऊन बघू. तिथे पोचल्यावर अपेक्षित चित्र दिसले. काही लोक मंदिरात भजन करत होते. त्या व्यतीरिक्त इतर कोणीही तिथे ऐकायला नव्हते. बाहेर काही लोकांशी बोलायला सुरुवात केली. बोलता बोलता नहेमीच येतात ते वाद प्रत्यवाद चालू झाले. मस्जिदीतून बांग येते ती मात्र तुम्हाला चालते. हिंदू धर्माचे मात्र चालत नाही. ते तुम्ही थांबवून दाखवा मग आमी हे थांबवतो. आता विचार करतो ते गांधींचे 'An eye for an eye makes the whole world blind' आठवते. अम्हाला मंदिरातूनच दोन लोकांचे नंबर मिळाले होते, त्यापैकी मोहोळ सर यांना फोन लावला. यांच्याशी मी आधीही बोललो आहे. मोहोळ सर हे आमचे नेहमी शांत पणे ऐकून घेतात. त्यांच्यावरच सगळा राग काढायला सुरुवात केली. ऐकतायत तर घ्या ओरडून. त्यांच्याशी बोलत असता समजले की त्यांच्या हातातही काही नाही. मग तो प्रयत्न सोडून दिला. बरेच वाद घालून झाल्यावर त्यांनी माइक काढला. भजन चालूच होते आणि भजन चालू असण्याबद्दल आमचा काहीच आक्षेप नव्हता. ते माइक लावून लाऊडस्पीकर वर प्रक्षेपित करण्याबद्दल आक्षेप होता. तरीही मी आणि आत्या समोरच्या पार-यांवर बसलो. मी आत्याला विचारले की त्यांनी माइक तर बंद केलाय आता आपण इथे का बसतोय. आत्या म्हणाली निषेध म्हणून. मग काही लोक म्हणाले की इथे     पाय-यांवर नका बसू, आत जावून बसा. मग आम्ही आत गेलो.

या सर्वात माझ्या हृदयाची गती वाढली होती. कशामुळे कुणासठावूक. इतक्या लोकांसमोर वाद घालण्याचा हा तसा पहिलाच अनुभव होता. मध्ये एकानी माझा हात धरून ढकलले ही होते. कदाचित भितीही वाटत असेल. तेवढ्यात कोणी येऊन चला चला भजन सुरू करा असे सांगितले. त्या भजन मंडळीला वाटले की मलाच गायचे आहे. मला फार मोह होत होता गायचा. विठ्ठलाचे भजन. मी आत्याकडे बघितले, ती म्हटली नाही गाता येत असे सांग. शांतपणे डोळे मिटळे, मांडी घातली आणि त्यांनी भजन सुरू केले.



लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥१॥
ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ॥२॥
जया अंगी मोठेपण । तया यातना कठीण ॥३॥
तुका म्हणे बरवे जाण । व्हावे लहानाहून लहान ॥४॥
महापूरे झाडे जाती । तेथे लव्हाळ वाचती ॥५॥



आत्मीयतेने आणि भक्तीभावाने गात होते. मनापासून. 

ऐकून शांत वाटायला लागले. हृदयाची गती परत स्थिरावली. घरी परतून आधी मोहोळ सरांना फोन लावला. घडलेल्या प्रसंगाबद्दल सांगितले. रागाच्या भरात काही उलट सुलट बोललो असेन तर क्षमा मागितली. त्यांनीही आम्हाला रोज त्रास होतो याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. पण त्यांचेही तिथे काही चालत नाही हे यावरून जाणवले.   दुस-याला समजून घेणे, जरा आवाज चढवला की ऐकून घेणे ही सज्जनाची लक्षणे त्यांच्यातही होती. आम्ही दोघेही एकाच बोटीत होतो.

दुस-या दिवशीही सकाळी 5:30 वाजता काकड आरती चालू झाली. सकाळी योगासन अभ्यासासाठी उठणे हे फार कठीण. पण उठल्या उठल्या या भजनांचे स्वर पडले की असे काही तरी वाटते की परत झोपच येत नाही. कधी विचार येतो की बरंच आहे. त्यानिमित्तानी रोज उठीन तरी. आणि योगासन वर्गात गेलो की सुटलो. आवाजही नाही आणि योगअभ्यासही होतो. दुहेरी लाभ. अडचणीचे रूपांतर संधीत. उठून 5.45 च्या सुमारास परत 100 वर फोन लावला. त्या व्यक्तीशी गप्पा मारल्या. की हा त्रास रोज होतो पण तुम्ही काहीच का करत नाही. त्यांनी सांगितले की पोलिस जाऊन येतात. थोडा वेळ आवाज बंद होतो पण मग परत सुरू होतो. अनेकदा वरून दबाव येतो. याची मला अपेक्षाच नव्हती. आता काय करणार?

काहीच सुचेना. येवून तंबोरा लावला आणि चादर डोक्यावर घेऊन परत झोपलो. योगासन वर्ग गेला खड्ड्यात.

आता हळू हळू समजते, मोठ्या माणसांमध्ये इतका निराशेचा सूर का असतो ते. बाबा नेहमी मला सांगतात, की कायदा कडक केल्याशिवाय  काहीच होणार नाही. डॉ राणी व अभय बंग यांच्या निर्माण उपक्रमात आम्ही विद्यार्थी आहोत. काही वेगळे करूयात, आपल्याभोवतालच्या परीस्थितीत काही चांगला बदल घडवण्यासाठी योगदान देत आपले आयुष्य जगूयात असे स्वप्न बघतो आहोत. आणि अशा लहानशाच प्रसंगातून परीस्थितीचे असे काही निराश विश्वरूप दर्शन घडते की काही समजेनासे होते. (विश्वरूप दर्शन वगैरे सगळे गीता थोडी थोडी वाचायला लागलोय म्हणून). क्षूद्रपणाची जाणीवच नाही तर सिद्धी होते, लहानपण मागावे लागत नाही.

अचानक, आधी वाचलेले गांधीजी थोडे थोडे समजत आहेत. अहिंसेचा स्वीकार करून इंग्रजांचा मारा सहन करणा-यांच्या जिद्दीचा अर्थ समजत आहे. अंधळ्या माणसाला रंग म्हणजे काय हे जसे समजू शकत नाही तसे या कल्पनांबद्दल मी आंधळाच होतो. 



दलाई लामा आणि तिबेट बद्दल कुंडुन नावाचा चित्रपट बघितला. त्यात तिबेट वर चीननी केलेक्या आक्रमणाचे वर्णन आहे. द्लाई लामांना तिबेट सोडून भारतात यावे लागले. 1959 सालापासून यांचा संघर्ष अहिंसक मार्गाने चालू आहे. कार्यरत पुस्तकात कर्नाटकातील चळवळीबद्दल लिहिले आहे. तिथे एका फॅक्टरीमुळे नदी आणि हवेचे प्रदूषण झालेले आहे. प्रत्येक श्वासागणिक लोकांना त्रास होतो आहे. इतर कितीतरी लोकांचे केवढे तरी तीव्र प्रश्न आहेत आणि आपण या छोट्याश्या त्रासाला का एवढे महत्त्व देतो. पण यावर एकच उत्तर सापडले आहे. की मोठा प्रश्न सोडवण्याचे सामर्थ्य काही आपल्यात नाही. जे आपल्या आवाक्यात आहे ते तरी करावे. 

सकाळी परत मंदिरात गेलो. मोहोळ सरांना भेटलो. सकाळपासून चाललेली आरती संपली होती व भोजन चालू होते. मोहोळ सर लोकांना वाढण्यात मग्न होते. गणेश घुले हे तिकडचे अध्यक्ष यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला. त्यांच्या म्हणण्यानुसार या मुळे धर्माचा प्रसार होतो. मला विचारले की धर्माच्या प्रसारासाठी मी काय करतो? मग त्यांनी त्यांच्या नेत्यांशी बोलायला सांगितले. प्रवीण चोरबेले. त्यांना समजवायचा प्रयत्न केला की आमचे घर लांब आहे तरीही तिथे थेट आवाज येतो. त्यांनी सांगितले, की तुम्ही दारे खिडक्या बंद करून बसा. कानात कापूस घालून बसा. आणि परत इथे येऊन त्रास देऊ नका. तुमच्या विरुद्ध पोलिस कम्पेंट करू. मग माझे नाव आणि फोन नं लिहून घेतला. मी ही त्यांचे नाव आणि फोन लिहून घेतला. आता काय करायचे याचा विचार चालू आहे. तुम्हाला काही सुचतेय?

-प्रियदर्शन 


Friday, October 30, 2009

कोहम् ?

27 ऑक्टोबर 2009 रोजी, मुंबईला, ‘Identity, Market and Social Welfare’, ‘ओळख, बाजारपेठ आणि सामाजिक कल्याण’ या शीर्षकाचे त्यांचे भाषण ऐकण्याची संधी मिळाली आणि आपल्या सर्वांना ओळख (Identity) देण्याचा घाट घातलेल्या UIAI आणि नंदन निलेकणी यांच्या मनात नेमके काय आहे हे थोडे थोडे समजले.


ओळख: नंदन निलेकणींची
इंफोसिस या कंपनीची स्थापना केलेल्या सहा उद्योजकांपैकी नंदन निलेकणी हे एक. पंतप्रधान मनमोहन सिंघ यांनी निलेकणी यांच्यावर भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरण (Unique Identification Authority of India, UIAI)  याची जबाबदारी सोपवली आहे. त्यानुसार जुलै 2009 मध्ये इंफोसिस मधून राजिनामा देऊन ते UIAI चे अध्यक्ष म्हणून रुजू झाले. ही त्यांची सर्वात नवीन ओळख. ‘Imagining India: The idea of a Renewed Nation’ या पुस्तकाद्वारे भारताबद्दलचे त्यांचे स्वप्न त्यांनी मांडले आहे. हे स्वप्न साकरण्यासाठी UIAI चे कार्य महत्त्वाचे ठरेल.


 प्रयोजन: सामाजिक कल्याणाच्या उपक्रमांची सद्य स्थिती
•    सध्या सामाजिक कल्याणासाठी अनेक योजना सध्या राबविल्या जात आहेत. त्यांवर भरपूर पैसा खर्च देखील होत आहे. जसे की रोजगार हमी साठी 2009-2010 साठी 40 हजार कोटी रुपयांची तरतूत केली गेली आहे. अनेक अशा योजना आहेत ज्याचा लाभ विशिष्ट घटकांना मिळतो. जसे की जननी सुरक्षा योजना ही मातांसाठी आहे, इंदिरा आवास योजनेत ग्रामीण भागात घरे बांधण्यासाठी अनुदान दिले जाते इत्यादी. या सर्व योजनांचा लाभ हा गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवणे हे फार मोठे आव्हान आहे. 25 वर्षांपूर्वी राजीव गांधी यांनी जाहीर केले होते की सामान्य माणसाठी तरतूत झालेल्या रुपयापैकी केवळ 16 पैसेच त्याच्यापर्यंत पोहोचतात. या परीस्थितीत आजतागयत फार काही बदल झालेला नाही असे माँटेक सिंघ आहलुवालियांनी नुकतेच म्हटले आहे.

•    सामाजिक कल्याणाच्या उपक्रमांचा आणि बाजारपेठेचा फार संबंध नाही. ही दोन वेगळी बेटे आहेत. सरकारने केलेल्या कल्याणकारी योजनांचा लाभ सरकारी यंत्रणेच्या मार्फतच लोकांपर्यंत पोहोचतो. जसे की कमी दरात धान्य पुरवठा म्हणजे रेशन साठी सरकारनी एक अवाढव्य यंत्रणा उभारलेली आहे. गोडाऊन पासून ते दळवळणापर्यंत सर्वच जबाबदारी सरकारी आहे व त्यामुळे अकार्यक्षमता येतेच, त्याचबरोबर गळतीही होते. मुक्त बाजारपेठेचा व खाजकी व्यवसायातील उद्योजकते मुळे येणा-या कार्यक्षमतेचा मिलाफ सामाजिक कल्याणाच्या उपक्रमांशी कसा जोडता येईल हे एक आव्हान आहे.

•    विविध प्रकारची ओळखपत्रे सध्या उपलब्ध आहेत. रेशन कार्ड, पासपोर्ट, इलेक्शन कार्ड, जॉब कार्ड इ. यात अनेक तृटी आहेत. खोटी, एकाच माणसाकडे एकापेक्षा जास्त, अस्तित्त्वात नसलेल्या मांणसांच्या नावावर असे अनेक गैर व्यवहार इथे चालतात. काही गावे अशी आहेत की जिथे लोकसंखेपेक्षा अधिक रेशन कार्डे आहेत आणि त्याच वेळेला गरजूंकडेच रेशन कार्ड नाही. त्यामुळे अनेक गैर व्यवहार तर चालतातच पण खरोखर गरजू असलेल्या माणसाला लाभ मिळतंच नाही.
या तिन्ही बाबी काही नवीन नाहीत. गेली अनेक वर्षे आपण यांच्याशी झगडत आहोत. सुदैवाने गेल्या काही वर्षात दोन व्यवस्थांमध्ये अमूलाग्र बदल झाले आहेत ज्याच्यामुळे आपल्याला या 60 वर्ष आपल्याला सतावणा-या प्रश्नांना सोडवणे शक्य झाले आहे असे वाटते आहे.

दोन क्रांत्या: मोबाईल फोन व इंटरनेट बँकिंग

मोबाईल: 10 ते 15 वर्षांपूर्वीचीच म्हणजे अगदी आत्ता आत्ता पर्यंत म्हणता येईल अशी. मोबाईल च्या इनकमिंग साठी देखील आपण 17 रु प्रति मिनिट देत होतो. 1999 साली अंदाजे 25 लाख मोबाईल ग्राहक होते, तेच 2009 साली अंदाजे 30 कोटी आहेत. यापैकी बहुतांशी प्रीपेड सुविधा वापरतात आणि त्यापैकीही बहुतांशी ही 10 रु चे रीचार्ज टाकतात. 15 वर्षांच्या काळात झपाट्याने हे बदल घडले आहेत.

इंटरनेट बँकिंग़: नव्वदच्या दशकात बँकांमध्ये हळू हळू संगणक रुजविण्यासाठी प्रयत्न चालू झाले आणि त्यावेळी या संगणक याचा उल्लेख न करता रंगराजन (ज्यांनी यासाठी प्रयत्न केले) याला अकाउंट्स लेजर असे म्हटले होते. संगणकाचा कामगार संघटनांकडून विरोध होईल या भितीने. पुढे काही वर्षांनी त्यानी याचे वर्णन ऍडवांस्ड अकाउंट्स लेजर असे केले. म्हणजे संगणकाची बँकेच्या संदर्भात त्या दिवसात ‘He who must not be named’ अशी ओळख होती . तेच आता आपण सर्वत्र एटीएम, इबँकिंग, ऑनलाइन ट्रान्स्फर असे सर्रास वापरतो. परंतू अजूनही ग्रामीण भागात आणि गरजूंपर्यंत या क्रांतीचे फायदे पोहोचले नाहीयेत.

युनीक आयडेंटिटी: एकमेव ओळख, विशिष्ट ओळख  वरील दोन क्रांतीकारक बदलांची सांगड सामाजिक कल्याणकारी उपक्रमांशी घालण्यासाठी बायोमेट्रिक तंत्रज्ञानाचा उपयोग UIAI करणार आहे. जसे की दहा बोटांचे ठसे डोळ्यामधील आयरीस ची खूण. नेमकी कोणती पद्धत वापरली जाईल हे अजून निश्चित झालेले नाही. अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीला एकमेव पद्धतीने ओळखले, की या ओळखीची सांगड इतर गोष्टींशी नेमक्या पद्धतीने लावणे शक्य होईल. जसे की र्बँकेतील इ-खाते. योजनेत आर्थिक व्यवखार असेल तर तो थेट व्यक्तीच्या खात्यात विनाविलंब पोहोचवता येईल. जेव्हा जेव्हा सरकारी योजनांचा लाभ व्यक्तीला मिळेल तेव्हा त्याची नोंद ठेवली जाईल. यामुळे अनेक गैरव्यवहारांना आळा बसेल.

समाजिक कल्याण व बाजारपेठेशी जोड
याचा मला जो अर्थ लागला तो Public Distribution System (PDS) च्या संदर्भात असा की सध्या अन्न धान्य गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम आहे. कोणते अन्न, त्याचा दर्जा, त्याची उपलब्धी याच्या निवड गरजू करू शकत नाही. मधली यंत्रणा (दुकानदार, कंत्राटदार) आपल्या सोयीनुसार, इच्छेनुसार जे आणि जेव्हा उपलब्ध करून देईल ते नाइलाजाने घ्यावे लागते. तेच जर सरकारने थेट पैसे त्या व्यक्तीच्या खात्यात जमा केले आणि या पैशांचा अन्नासाठीच उपयोग केला जाईल अशी सुविधा केली (संगणकाद्वारे असा प्रोग्रॅम लिहिणे शक्य आहे) की मग ती व्यक्ती अन्न कुठून, केव्हा घ्यायचे याचा निर्णय स्वयं घेऊ शकेल. मुक्त बाजारव्यवस्थेतून निवड करून ती हा निर्णय घेईल आणि बाजारपेठेशी जोडली जाईल. अर्थात याचे फायदे जसे आहेत तसेच धोकेही आहेत. खाजकीकरणातून सेवेचा दर्जा वाढतोच असे नाही. या बद्दल सतत सतर्क रहावे मात्र लागेल. पण नेमके म्हणजे काय याचा माझा अभ्यास नाही.
देशातील सुरक्षेशी याचा जवळचा संबंध आहे. पण या संदर्भात निलेकणी बोलले नाही. स्वातंत्र्य अबाधित राखून सुरक्षा साधणे हे या बदलासमोरचे मोठो आव्हान राहणार आहे.

सारांश
या प्रकल्पामुळे अनेक फायदे दिसत असले तरी यातून निर्माण होणारे धोके असणारच ज्याचे सध्या भाकित करणे आपल्याला जमणार नाही. पेट्रोल च्या जोरावर आपण प्रचंड प्रगती केली तरी त्याचा आता ग्लोबल वॉर्मिंग शी संबंध आपल्याला आता समजलाय तसे. या निमित्ताने एक महत्त्वाची गोष्ट घडणार आहे ती म्हणजे या तंत्रज्ञानातील क्रांतीचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. याचे महत्त्वाचे कारण हे राजकीय इच्छाशक्ती. वरून जरी इच्छा असली तरी मधल्या अनेक घटकांच्या विरोधाला सामना द्यावा लागणार आहेत.

तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आपल्यातील भ्रष्ट वृती, हाव ही काही बदलणार नाही. यांशी आपला लढा व्यक्तीगत आणि सामाजिक पातळीवर चालूच राहील.

-प्रियदर्शन

Monday, October 12, 2009

लोकशाही च्या प्रयोगातील निर्णायक वळण: एका अज्ञानी युवकाच्या दृष्टीतून

ADR (Association for Democratic Reforms) व NEW (National Election Watch) यांनी केलेले काम हे  लोकशाही बळकट करण्यासाठीचा फार महत्त्वाचा टप्पा वाटतो. महाराष्ट्रात 13 ऑक्टोबर 2009 रोजी निवडणूक होणार आहे. NEW नी 169 उमेदवार, जे 2004 साली उभे होते व आता 2009 मध्ये परत उभे रहाणार आहेत अशा उमेदवारांची माहिती संकलित केलेली. याची PDF आपल्याला इथे मिळेल.
या 169 उमेदवारांच्या माहितीचा थोडा अर्थ लावण्याचा प्रयत्न

सरासरी मालमत्ता
  • 2004 साली 1.3 कोटी होती 
  • 2009 साली 3.8 कोटी आहे 
  • म्हणजेच सरासरी 2.5 कोटी ची वाढ 
एकूण मालमत्ता 
169 उमेदवारांची मिळून एकूण मालमत्ता 
  • 2004 साली 229 कोटी 
  • 2009 साली 657 कोटी 
  • म्हणजेच 428 कोटी ची वाढ
पक्ष निहाय उमेदवारांची मालमत्ता
  • काँग्रेस    39 उमेदवार:    एकूण 291 कोटी:   सरासरी 5.8 कोटी
  • राष्ट्रवादी  39 उमेदवार:    एकूण 139 कोटी:   सरासरी 3.5 कोटी
  • शिवसेना 33 उमेदवार:    एकूण 131 कोटी:   सरासरी 3.8 कोटी
  • बीजेपी     23 उमेदवार:   एकूण 48   कोटी:   सरासरी 2 कोटी
Top 10 अमीर उमेदवार

तक्त्यावर क्लिक करा!!

















विचार, विश्लेषण 
आपले राजकीय पुढारी हे पैसेवाले आहेत हे तर यावरून सिद्ध होते. पण पैसे असणे हा काही गुन्हा नाही. हे पैसे नेमके कसे मिळवले जातात हे समजले पाहिजे. ते कसे समजेल?

एका थियरी नुसार बदल घडण्यासाठी च्या चार पायर्‍या असतात. विवेक सावंतांकडून मी या शिकलो. त्या चार पायर्‍या आहेत
  • Information: परीस्थिती काय आहे, नेमका प्रश्न काय आहे या बद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचणे ही पहिली पायरी. जसे की ग्लोबल वॉर्मिंग बद्दल 'Inconvenient Truth' या चित्रपटाद्वारे शास्त्रशुद्ध माहिती अनेक लोकांपर्यंत पोहोचली. अनेक नेते पैसे खातात हे जरी सर्वज्ञात असले तरी याची नेमकी अकडेवारी आता आपल्या समोर आहे. चला तेवढे नीट समजले.
  • Interaction: एकदा महिती पोहोचली की लोक त्यावर विचार करतात, चर्चा करतात वाद घालतात... या बद्दल काही करता येईल का याबद्दलचे मार्ग शोधायचा प्रयत्न करतात. आजकाल ब्लॉग्स लिहितात :) ही झाली दुसरी पायरी. 
  • Transaction:  त्यापैकी काही लोक या बद्दल कृती करायला लागतात. वैयक्तिक, एकत्र येवून, अनेको प्रकारच्या ज्याला जमेल तशा.
  • Transformation: या तिन्ही पातळ्यांवर अनेको लोक आपापल्या परीने योगदान देत असता... कधीतरी अशी एक अवस्था निर्माण होते की बधल घडून येतो. 
राजकारणी आणि नोकरशाहीतील भ्रष्टाचारी वृती यावर नियंत्रण आणण्याच्या लढ्यात माझ्या मते आपण पहिल्या पायरीवर आहोत. व्यापक प्रमाणात लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे हे इंटरनेट, मोबाईल या माध्यमातून शक्य झाले आहे. यांचा उत्तमोत्तम वापर करून ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे चालूच ठेवावे लागेल. इंटरनेट सध्या काही मर्यादित वर्गापर्यंत पोहोचले आहे. पण हा वर्ग म्हणजे माझ्या तुमच्या सारख्यांचा वर्ग. जो राजकीय बाबतीत सर्वात कमी जागृत असायचा. त्यामुळे आता राजकीय वास्तव एक वेगळेच वळण घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

दुसर्‍या आणि तिसर्‍या पायर्‍यांवर आपण कसे काम करायचे हे आता आपल्या समोरील आव्हान राहील.

भारतातील अवाढव्या अशा लोकशाही च्या LIVE प्रयोगात काय काय घडते त्याबद्दल उत्सुक!!

-प्रियदर्शन

Book Review - Small is Beautiful

Small is beautiful
-By E.F. Schumacher

Written during the 1973 energy crisis, it was a very influential book which is divided into four parts of 'The modern world', 'Resources', 'The Third World' and 'Organization and ownership'. The ideas discussed and lessons learned are also very much relevant even today.

Frankly I was not able to clearly interpret everything that I read but sometimes that fact itself makes a book much more interesting.

To start with I was told that the book is on economics but it covers a lot many things and yes all that is done from the point of view of economics. Many a times I felt like the things what I am
reading are no way near to economics(It is off course my inability to connect) but it is fun to read anyways.

At first you start reading and you feel like it is a collection of authors thoughts on various issues which are vaguely organized and the chapters flow in a direction that don't seem to make sense but soon as you get the big picture you realize that the agruments made were very much affable to the given conclusion. The thing that I liked especially is the abundant reference text from other books and wise wording of various great persons are included at
regular interval.

Since I found it a bit hard to read, I might as well include my
way to do it :)
The best way to read (According to me),
1) Start the book with aim that you will read at least two chapters
(Because if you don't do so, there is very high probability that you
will not understand a para, loose interest and keep the book aside)
2) Stop in between and think about what you read. (Only then you
realize the beauty of the ideas conveyed)
3) Finally keep the book aside and you will feel happy that you read
significant part. (Don't read lot because I felt like the material is
bit heavy to digest)

To describe the things in short, man in his excitement to utilize and develop his scientific and technical powers has built a system that ravishes nature. His ever-increasing infinite needs cannot be satisfied by finite resources. The importance to consider the human factor while measuring various economic parameters, importance of land as a resource, ownerships in
large scale organizations and many such interesting topics are discussed.
So people who like to put their thinking cap on and are interested in
studying various systems should surely read this one.

Note :- You need not know any economics to enjoy the book. :)

-Anwar Sahib

Friday, October 9, 2009

ADR, NEW and The Business Model of Politics

For a Marathi Version of this article click here!
Inspired from P.Sainath's article. Read it here!
Starting a new business, we think about profit and growth. Entrepreneurs across the world are innovating different business models to solve the complex challenges that our world is facing. P. Sainath's article and the efforts of NEW (National Election Watch)   have brought forth this revolutionary new business model. (Not that it was completely unknown, but now we have numbers to back our intuition)
ADR and NEW
Got introduced to some innovative social initiatives. ADR (Association of Democratic Reform) filed a PIL in response to which the Supreme Court resolved that candidates standing for elections have to declare their assets, education and criminal record. To know the historical journey of this PIL visit here! NEW is a collective effort by 1200 organizations who are organizing this information for public viewing.
Some facts and numbers
In Hariyana 42 MLA's who are re contesting have astonishing information to share.
  • Average wealth has grown by 4.8 crore Rs
  • i.e. average rise of 388%
  • i.e. average rise of  8 lakh Rs/month
  • i.e about 1,100 Rs/day
  • The top four MLAs (considering growth rate) have a growth of 800%
  • The topper amongst them has an astonishing growth of 5000% which means from an initial of 1 lakh Rs it is now 50 lakh Rs
Learning from these numbers P. Sainath suggests that every citizen should become an MLA atleast once. It would be the most promising poverty alleviation program. Even if we consider the recently increased minimum wage of NREGA of Rs 100, a worker turned MLA would earn in a months time what he/she aould have earned in 8000 days (20 years).
myneta.info An Information Revolution
To access information of a candidate from your constituency, visit myneta.info Info on most candidates is available. See and be aware... as I did :) 
Challenges ahead
The work done by ADR is very inspiring. They have not stopped at filing the PIL. Through NEW they are also documenting the information in a relevant format. Two very important milestones in strengthening the democracy of our country. This power of information has greatly empowered us. So where do we go from here?  Currently I'm spreading this information to as many people as I can. 
I still have some questions
  • What happens of the MLA whos wealth grows from 1 lakh to 50 lakh?
  • What is the mystery behind this?
  • How does Govinda work in films even when he is elected representative?
  • What can I do?
Looking forward to ideas, suggestions, questions... 


Optimistic Inspite,
-Priyadarshan

ADR, NEW व राजकारणाचे बिसनेस मॉडेल

पी साईनाथ यांच्या लेखावरून प्रेरीत . इथे वाचू शकतो.
नवीन उद्योग सुरू करताना आपण अर्थातच नफ्याचा विचार करतो. जगातील जटिल प्रश्न सोडवण्यासाठी अनेक उद्योजक नवनवीन प्रयोग करून वेगवेगळी बिसनेस मॉडेल्स विकसित करत आहेत. पी साईनाथ यांच्या लेखामुळे व NEW, (National Election Watch) या नवीन चळवळीच्या कामातून हे अफलातून, अविश्वसनीय वाटावे असे बिसनेस मॉडेल समोर आले आहे. (हे माहित नव्हते असे नाही पण नेमकी आकडेवारी मिळाल्यामुळे हे नीटच समजले आहे)
ADR व NEW
या निमित्तानी नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम समजले. ADR (Association of Democratic Reforms)  यांनी केलेल्या PIL मुळे 2002 साली उच्च न्यायालयानी असा निर्णय दिला की निवडणूक लढवणार्‍या उमेदवाराने आपले शिक्षण, मलमत्ता व criminal record जाहीर केले पाहिजे. या PIL च्या प्रकियेचा इतिहास इथे वाचा. NEW ही 1200 चे संघटन आहे व ते उमेदवारांनी जाहिर केलेली माहिती संकलित करून लोकांसमोर मांडतात.
काही आकडेवारी: एक यशस्वी बिसनेस मॉडेल
हरियाणा मध्ये 42 MLA जे पुन्हा उभे आहेत त्यांबद्दल काही माहिती
  • सरासरी त्यांची मलमत्ता 4.8 कोटी रुपयांनी वाढली आहे
  • सरासरी 388% मालमत्तेत वाढ
  • म्हणजेच प्रत्येकाची सरासरी दर महा वाढ 8 लाख रुपये 
  • म्हणजेच अंदाजे 1,100 रु
  • प्रति तास 
  • वाढीचा सर्वोत्कृष्ट दर असलेले पहिले 4 MLA यांच्या मालमत्तेत 800% वाढ आहे 
  • यातील अग्रक्रमांकावर असलेला MLA ज्याची मालमत्ता 1 लाख होती त्यात 5000% वाढ असून ती आता 50 लाख रुपये झालेली आहे
हा वाढीचा दर लक्षात घेता साईनाथ म्हणतात की प्रत्येक भारतीय नागरीकाने किमान एकदा तरी MLA बनावे! गरिबी हटवण्यासाठी चे हे सर्वोत्तम बिसनेस मॉडेल राहील. NREGA चे वाढीव 100 रु किमान वेतन जरी धरले, तरी 8000 दिवस (20 वर्षे) राबून झालेली कमाई महिन्यात होऊन जाईल.


myneta.info माहितीची क्रांती
आपल्या मतदार संघातील उमेदवाराची माहिती हवी असल्यास myneta.info वर मिळेल. बहुतांशी उमेदवारांची माहिती इथे उपलब्ध आहे. बघा... व जागृत व्हा... मी झालो तसा :)
पुढील आव्हाने
ADR नी केलेल्या कामातून प्रचंड फारच प्रेरणा मिळाली. केवळ PIL करून ते थांबले नाहीत. NEW या उपक्रमातून त्यांनी या माहितीचे उचित स्वरूपात संकलन करण्याची जबाबदारीही हाती घेतली आहे. लोकशाही ला बळकट करण्यासाठी ही दोनही केवढी महत्त्वाची कार्य!  प्रत्येक सामान्य माणसापर्यंत ही केवढी मोठी माहितीची ताकत या कार्यामुळे आली आहे.  आता पुढे काय? सध्यातरी मी माझ्या मित्रपरीवारामध्य या महितीचा प्रचार करतो आहे.
आजून काही बाळबोध प्रश्न पडतात.
  • 1 लाख रुपयापासून 50 लाख रुपयापर्यंत जाणार्‍या माणासाचे काय होते? 
  •  नेमके या मागचे गूढ काय असते? 
  • गोविंदा निवडून आल्यावरही चित्रपटात कामे कसे काय करतो? 
  • मी काय करू शकतो?
तुम्हालाही काही सुचत असेल, प्रश्न असतील तर शेअर करा ...

तरीही प्रचंड आशावादी मनस्थितीत...
-प्रियदर्शन

Tuesday, September 22, 2009

Book Review - Duishen

Duishen
-by Chingiz Aitmatov
(Translated from the Russian in English by Olga Shartse)

The description “If there is one single book on education which will make you weep, this is it.”, stands very true.

The story is narrated by an artist who is given the responsibility to convey a touching story of an orphan who for the first time ever is treated with love and respect by the teacher who is like an elder brother to her. This story revolves around an illiterate teacher, his student and the two poplars (type of tree) standing tall like forming a link between the past and the present.

The background is the rustic village of Kurkureu where a girl has to bear with the harsh treatment of her aunt as she is an orphan with only other refuge of her aging grandmother. Ignorant of her rights and potentials she quietly endures everything until the day hope in form
of Duishen arrives. Duishen in spite of himself being barely literate sets about to achieve a nearly impossible task of setting up a school in a place where the notion of schools itself is unheard of.

With unwavering courage he sets about his tasks of teaching children whose and forefathers had all been illiterate. Naturally he receives absolutely no help from the villagers and is mocked at when he works in freezing temperatures to build a school out of an old stable on a hill. Hardly able to read, with no textbooks and completely innocent of grammar he gives in his best, teaching whatever he thought children should know giving them glimpses of a new and wonderful world. Although at that time it seemed like his hard work was in vain but in long run he accomplished more than he realized.

The fact that it is narrated by an artist who is puzzled as to what picture he should draw related to the story, made me instantly connect as I love both, writing and drawing. Some things are left untold in the end adding a sense of incompleteness to the story leaving the reader to predict the rest. The sentences are very picturesque describing the scenic beauty of the place and the language used makes you think that you are reading a literary masterpiece but unfortunately as opposed to masterpieces it is only 35 pages long... :(

35 pages of pure emotion and inspiration with many dramatic scenes. Duishen's patriotic nature, his struggle to keep his promises made to children, effort to make children laugh in spite of himself facing insults and the fighting spirit showed by a simple village girl make you want to read this book again and again....

-Anwar Sahib

देशमुख जाधव भाई-भाई...

पाण्‍याच्‍या आवाजानं सकाळी पाचलाच जाग आली. थंडी पडलेली.. कम्‍प्‍युटरचा खूप मोह होत असूनही घरातल्‍या कामाला लागले. संध्‍याकाळी आणलेलं किराणा सामान भरुन ठेवायचं होतं. अपूर्वला उठवलं. भराभर आवरलं. ऑफीसला जाण्‍यासाठी दार उघडणार तोच दारावरची बेल वाजली. डेंग्‍यू पेशंट अपूर्व परीक्षेसाठी कॉलेजला गेलेला, कोण असू शकतं यावेळी? जरा आश्‍चर्य वाटून दार उघडताच समोर एक अधिकारी आणि दुसरा त्‍याचा मदतनीस अशी जोडी दिसताच मी ओळखलं ते कोण असावेत. मी त्‍यांना ‘आत या’ म्‍हणत सोफ्याकडे निर्देश केला. दीनानाथ हॉस्पिटलमधून अपूर्वला डिसचार्ज मिळताना डॉक्‍टरांनी सांगितलं होतं की, ‘आठ दिवसाच्‍या आत मनपाचं पथक तुमच्‍या घरी येऊन जाईल. तुमच्‍याकडून सगळी हिस्‍ट्री ते घेतील आणि फवारणी करतील. हॉस्पिटलकडून अशा पेशंटबद्दल त्‍यांना कळवावं लागतं आम्‍ही ते कळवलंय’. मला डॉक्‍टरांनी सांगितलेलं सगळं आठवत होतंच.

मी त्‍यांच्‍यासमोर ऑफीसला उशीर होत असूनही बसले. मनपाचे डेंग्‍यू पथकाचे मुख्‍य कर्मचारी जाधव म्‍हणून होते.

त्‍यांनी मला आपुलकीनं विचारलं,’पेशंट कोण ?’

मी म्‍हटलं,’ माझा मुलगा’

ते म्‍हणाले, “किती वर्षाचा ?”

मी- “19 वं चालू आहे”.

“आता कसा आहे ?”,

मी सांगितलं “आता चांगला आहे. परीक्षा देण्‍यासाठी गेलाय”.

मग त्‍यांनी विचारलं,’ कधी त्रास सुरु झाला?”,

मला 30 ऑगस्‍ट आठवला. त्‍याची थंडी वाजून चढणारा ताप, दुखणारं डोक,अंग, लालेलाल झालेला चेहरा आणि तळहात...ससून हॉस्पिटल...दीनानाथ हॉस्पिटल.. सगळं तारीख आणि वेळेनुसार आठवलं. मी त्‍यांना आवश्‍यक ते सांगत गेले....तो आत्मियतेनं ऐकत होता.

“घरात किती लोकं असता ?”

मी म्‍हटलं, “आम्‍ही दोघंच”,

तो म्‍हणाला, “इथं कधीपासून आहात”.

मी म्‍हटलं, “दोन-तीन महिने झालेत, याआधी मी मुंबईला होते”.

तो म्‍हणाला, “मिस्‍टरांचं नाव?”,

मी सांगितलं. तो म्‍हणाला, “काय करतात ते, मुंबईला असतात ?”

मी म्‍हटलं, “ते नाहीत आता. आम्‍ही दोघंच असतो”.

तो म्‍हणाला, “सॉरी मॅडम”.


Its ok म्‍हणत मीच त्‍याला समजावलं. पण एकूणच मला इतकं छान वाटत होतं. त्‍याचं विचारणं एक गंभीर कोरा चेहरा ठेवून यांत्रिकपणे नव्‍हतं तर इतक्‍या आपुलकीनं तो विचारत होता की तो माझा कुणी नातलग असावा असं मला वाटत होतं. त्‍याला सगळं घर पहायचं होतं. घरात फ्रीज, कुंड्या आहेत का, कुठे पाणी साठलंय का..खूप व्‍यवस्थित काळजीपूर्वक तो सारं पहात होता. बोलत बोलत आम्‍ही बाल्‍कनीत आलो. तो म्‍हणाला, “तुमच्‍या नावाचा खाली सोसायटीत बोर्डही नाही. तुम्‍ही हा फ्लॅट आत्ताचं विकत घेतलाय का ?” त्‍याच्‍या या प्रश्‍नानं “चला घेऊनच टाकूया आता” असा फील मला आला. मी मनाला दटावत आनंदीत झालेला चेहरा जाणीवपूर्वक गंभीर करत “मी इथं रेन्‍टनं, किरायानं रहाते” असं सांगितलं. तो म्‍हणाला, “मॅडम, तुमचा हा फ्लॅट खूप छान आहे !” मी मान डोलावली. त्‍याच्‍यासाठी कांदेपोहे आणि चहा करावा असं मला तीव्रतेने वाटू लागलं. पण ऑफीसला होत जाणारा उशीर बघून मी मनाला पुन्‍हा आवरलं.

त्‍यानं एक पॅम्‍प्‍लेट मला दिलं. त्‍यात डेंग्‍यूबद्दलची माहिती होती. तो स्‍वतःही काय काय काळजी घ्‍यावी याबद्दल मला सविस्‍तर सांगू लागला. त्‍याचं पथकही तितकंच प्रेमळ आणि गुणी होतं. घरात परवानगी घेऊन (जसं शाळेत मुलं “बाई आत येऊ ?”, किंवा “मे आय कमइन?” विचारतात तसंच विचारत ते आत आलं.) सगळीकडे फवारणी करु लागले. मला या सगळ्यांमुळे ‘घर भरल्‍यासारखं वाटतं’ म्‍हणजे काय याचा प्रत्‍यय येऊ लागला. दिवाळी किंवा दसरा साजरा करावा असंही वाटू लागलं. या धावणा-या मनाला काबूत ठेवता ठेवता माझ्या नाकी नऊ (किंवा दहा) येऊ लागले.

माझ्या शेजारी कोण रहातं याची त्‍यांनी चौकशी केली. मग प्रत्‍येक फ्लॅटमध्‍ये जाऊन फवारणी करत ते पॅम्‍प्‍लेट देत माहिती देऊ लागले. काय करावं याबद्दल सांगू लागले. घरात ज्‍या बारकाईनं ते त्‍या डेंग्‍यूला शोधत होते. मलाही कुतूहल वाटू लागलं. यांना तो डेंग्‍यू डास कसा सापडणार, कळत नव्‍हतंच. मी विचारताच ते म्‍हणाले, “सापडेल. फ्रीजमागं, कुठंही कोप-यात..” मग ते टेरेसवरही गेले. तिथे त्‍यांना एका अर्धवट पाण्‍यानं भरलेल्‍या बादलीत डासांची अंडी दिसली. ती गील नावाच्‍या आमच्‍या फ्लॅटधारकाची होती. विजयी मुद्रेनं त्‍याचा नायनाट करीत ते फ्लॅटच्‍या खाली लिफ्टचा वापर न करता पाय-यानं उतरले. मला आठवलं. काहीच म्‍हणजे पंधरा दिवसांपूर्वी मी आणि अपूर्व लिफ्टमध्‍ये अडकलो होतो. म्‍हणजे लिफ्टचं दार उघडतच नव्‍हतं. मग खालीवर करत टेरेसवर पोहोचून ते शटर उघडण्‍याचा आटोकाट प्रयत्‍नही केला होता. आणि लाईट गेल्‍यामुळे आता लिफ्ट खालीदेखील जाऊ शकत नव्‍हती. टेरेसवरुन ओरडूनही कोणालाही आवाज ऐकू जाणं शक्‍य नव्‍हतं. त्‍यावेळी चावला असेल का हा डेंग्‍यू डास ? त्‍यावेळी त्‍या गील महोदयांनीच अनेक क्‍लुप्‍त्‍या करीत आम्‍हाला लिफ्टच्‍या बाहेर काढण्‍यास मदत केली होती. मी जाधवांना ही माहितीही पुरवली. ते म्‍हणाले, “लिफ्टमध्‍ये अडकण्‍याची भीती मलाही फार वाटते त्‍यामुळे मी आपला पाय-या चढत उतरतच कामं करतो”.

खाली येताच निरीक्षण करणारे इतर कर्मचारी बघून मी त्‍यांच्‍याशी बोलती झाले. ते कर्मचारी मला सांगत होते. “सोसायटीचं चेअरमन कोण आहे ?” अर्थातच माझ्या स्‍मरणशक्‍तीनं याही वेळेस मला दगा दिला. मला आठवेचना. खरं तर मेन्‍टेनन्‍स द्यायला मी त्‍यांच्‍याकडे गेले होते. मग मला जरावेळानं एकदम नाव आठवलं. “कुर्तकोटी..”.मी ओरडले. तो म्‍हणाला, “बघा ना, पिण्‍याच्‍या पाण्‍याची टाकी आणि झाकणं तुटलेलं, किती कचरा आत जात असणार, डासांची अंडीही या उघड्या पाण्‍यात होणार...शिकलेल्‍या लोकांनी ही काळजी घेऊ नये का ? तुम्‍ही बघाच. म्‍हणजे तुम्‍ही काळजीनं त्‍यांना सांगू शकाल. एक झाकण करुन घ्‍या ताबडतोब”. तो अतिशय मृदू आवाजात मला सांगत होता. सरकारी किंवा कुठलेली कर्मचारी ज्‍या दमदाटीच्‍या आवाजात गुरकावतात आणि आपण गुन्‍हेगार आहोत असं वाटण्‍याचा न्‍यूनगंड आपल्‍याला देतात त्‍यापेक्षा हे सगळं उलटंच चित्र होतं.

तो म्‍हणाला, “तुम्‍हाला उशीर होतोय का, तुम्‍ही जाऊ शकता ऑफीसला..आमचं काम चालू राहील. आम्‍ही उद्याही येऊ”. आसपासही ते फवारणी करत होतेच. मला त्‍या सगळ्या पथकाचाच अभिमान वाटला. इतकी जागरुकता, आणि कामाला दिलेला माणुसकीचा चेहरा मला थक्‍क करुन गेला. मी अक्षरशः तरंगतच आफीसला येऊन पोहोचले. या आनंदाचं काय करावं हे कळत नव्‍हतंच. मग मी जरबेराची छानशी केशरी रंगाची दोन फुलं घेतली. जरबेरासारख्‍याच असणा-या पॅट्रिशा मॅडमच्‍या केबिनचं दार ठोठावत त्‍यांना दिली. त्‍यांनीही “Thank you, how is your son ?” म्‍हणत ती स्‍वीकारली. मी तशीच तरंगत माझ्या जागेवर आले. सागर जोशी प्रसन्‍न चेह-यानं माझ्याजवळ आला होता. त्‍याच्‍या हातात माझ्यासाठी आणलेली दोन जरबेराची टवटवीत फुलं होती. मी ती हातात घेतली. असं वाटलं जोरदार आवाजात म्‍हणावं,

देशमुख जाधव भाई भाई....

-दीपा देशमुख


Saturday, September 19, 2009

गाव छोडब नही

मित्रांनो,

काही ब्लॉग्स वाचत असताना हे गीत ऐकले. विचार करायला लावले. शब्द जेवढे समजले तसे लिहिले आहेत. गीत ऐकून खालील शब्दांमध्ये काही चुकले असेल तर कळवावे. विडियोत सब टायटल्स इंग्लिश मधे आहेत.

गाव छोडब नही, जंगल छोडब नही,
माय माटी छोडब नही लाडाय छोडब नही।

बाँध बनाए, गाँव डुबोए, कारखाना बनाए ,
जंगल काटे, खदान खोदे , सेंक्चुरी बनाए,
जल जंगल जमीन छोडी हमिन कहा कहा जाए,
विकास के भगवान बता हम कैसे जान बचाए॥

जमुना सुखी, नर्मदा सुखी, सुखी सुवर्णरेखा,
गंगा बनी गन्दी नाली, कृष्णा काली रेखा,
तुम पियोगे पेप्सी कोला, बिस्लरी का पानी,
हम कैसे अपना प्यास बुझाए, पीकर कचरा पानी? ॥

पुरखे थे क्या मूरख जो वे जंगल को बचाए,
धरती रखी हरी भरी नदी मधु बहाए,
तेरी हवसमें जल गई धरती, लुट गई हरियाली,
मचली मर गई, पंछी उड गई जाने किस दिशाए ॥

मंत्री बने कम्पनी के दलाल हम से जमीन छीनी,
उनको बचाने लेकर आए साथ में पल्टनी
हो... अफसर बने है राजा ठेकेदार बने धनी,
गाँव हमारी बन गई है उनकी कोलोनी ॥

बिरसा पुकारे एकजुट होवो छोडो ये खामोशी,
मछवारे आवो, दलित आवो, आवो आदिवासी,
हो खेत खालीहान से जागो नगाडा बजाओ,
लडाई छोडी चारा नही सुनो देस वासी ॥

This video is a description of how life seems to our Adivasi community. It has subtitles in English so the meaning can be well understood.


Saturday, September 5, 2009

Sayano Sushenskaya catastrophe and PPP

17 ऑगस्ट 09 ला रशियातील सर्वात मोठ्या जल विद्युत प्रकल्पात अपघात घडला. टरबाईनचे झाकण तुटून रोटर हवेत उडाले आणि सर्वत्र पाणी शिरले. यात 75 कर्मचारी दगावले. चेर्नोबिल नंतर हा रशियातील सर्वात मोठा तांत्रिक अपघात असे मानले जात आहे.

Sayano Sushenkaya प्रकल्प

रशिया मध्ये बोरिस येस्ल्टिन राष्ट्रपती असताना सरकारी यंत्रणा आणि उद्योजक यांमध्ये सलगी निर्माण झाली ज्याला पुटिन च्या काळातही बढावा मिळाला ज्यामुळे भ्रष्ट आर्थिक व्यवस्था निर्माण झाली, ज्याला burness म्हणजे bureaucratic business असा वाक्प्रचार वापरला जातो. याचेच फलरूप सयानो च्या प्रकल्पात दिसत होते. ओलेग डेरिपास्का या उद्योजकाचे क्रेमलिन शी घनिष्ट संबंध होते. रसअल (RusAl) ही त्याची कंपनी ही जगातील सर्वात जास्त ऍल्युमिनियम बनवणारी कंपनी आहे. सयानो प्रकल्पात गेले काही महिने क्षमतेला ताण देवून वीज निर्मिती होत होती. त्यापैकी 75 टक्के वीज ही रसअल सवलतीच्या खरेदी करत होती. रशिया मध्ये वीजेचा दर सरकार ठरवते. इतर ग्राहक व घरगुती वीज पुरवठा दरापेक्षाही कमी दरानी रसअल ला वीज विकली जात होती. रसअल ला झालेल्या नफ्यामध्ये सरकारचा काहीच वाटा नव्हता. या नफ्यातून काही रक्कम ही सयानो च्या दुरुस्ती साठी वापरता येवू शकली असती.

2005 ते 2008 या दरम्यान नेब्रिसाका यांना सरकारकडून $8.2 बिलियन डिविडंट म्हणून मिळाले. मंदी येताच बेलआऊटची मागणी नेब्रिसाका यांनी केली आणि त्यांना सरकारनी $4.5 बिलियन डॉलर देऊ केले. अर्थतज्ञ डेल्यागिन यांनी याचे वर्णन ‘Privatization of profit and nationalization of loss’ असे केले आहे!

भारतातही PPP चे प्रयोग आता चालू झाले आहेत. PPP म्हणजेच Public Private Partnership. याचे फायदे आणि दुष्परिणाम अनेक ठिकाणी आपल्याला दिसून येते. कंत्राटदार राज म्हणजेच काँट्रॅक्टर राजचा एक जमाना होता. NREGA मध्ये कंत्राटदाराला काढून सरकार नी सर्व जबाबदारी घेतली आहे. दुसर्‍या बाजूला PPP च्या तत्त्वावर चालणारी cleartrip.com याची सेवा सरकारी irctc.co.in च्या पेक्षा कितीतरी चांगली आहे.

PPP मधल्या Public मुळे प्रचंड ताकत येते (आर्थिक, पायाभूत सुविधा, व्याप्ती) आणि Private मुळे कार्यक्षमता आणि उद्योजकता येते. पण या दोघांचे संगन्मत होवून लुबाडणारे लुटारू लोक निर्माण होण्यापासून थांबवण्यासाठी कोणती व्यवस्था तयार करायची हे मोठे आव्हान आहे.

MKCL हा PPP च्या एक पाऊल पुढे जाऊन यातील तोटे कमी करण्याचा एक प्रयोग आहे. पण त्याबद्दल अभ्यास करून मग लिहीन.

या निमित्त काही आकडेवारी

1979 मध्ये बांधलेला सयानो सुशेंकया प्रकल्प हा वीज निर्मिती क्षमतेनुसार जगातील सहाव्या क्रमांकाचा व एशियातील प्रथम क्रमांकाचा जल विद्युत प्रकल्प आहे. इथे अंदाजे 6700 MW वीज निर्मिती होते. रशिया च्या एकूण वीज निर्मिती च्या 2.5 टक्के व जल विद्युत निर्मिती च्या 25 टक्के वीज इथे निर्माण होते.

जगातील सर्वात मोठा जल विद्युत प्रकल्प हा चीन मध्ये, थ्री गॉर्जेस डॅम या ठिकाणी आहे. सध्या इथे 18,300 MW इतकी वीज निर्माण होते आणि काम पूर्ण झाल्यावर 22,500 MW निर्माण होईल.

भारतात सध्या अंदाजे 1,50,000 MW इतकी वीज निर्माण करण्याची क्षमता आहे. त्यापैकी 37,000 MW वीज ही जल विद्युत पद्धतीनी होते.

सध्या महारष्ट्रातात (व भारतातही) कोयना जल विद्युत प्रकल्प (अंदाजे 2000 MW) हा सर्वात मोठा जल विद्युत प्रकल्प आहे. चंद्रपूर इथे कोळशापासून औष्णिक वीज प्रकल्पात अंदाजे 2400 MW वीज निर्मिती होते.

सतलज नदीवरचा नाथपा झाकरी प्रकल्पात 1,500 MW वीज निर्माण होते.

कोयना प्रकल्प

4 सप्टेंबर 2009 च्या द हिंदू या वर्तमानपत्रात आलेल्या अग्रलेखावरून प्रेरीत. हा लेख आपण इथे वाचू शकता.

-प्रियदर्शन