Wednesday, January 5, 2011
आपल्या प्रशासनाबद्दल: रोजगार हमी निमित्त
Thursday, October 14, 2010
एका हाकेवर
यासाठी आदल्या दिवशी मी मंदिरासमोर बसलेल्या मुलांना गांधी जयंती व स्वच्छता यांचं महत्व सांगितलं होतं. आणि सकाळी फक्त एक हाक मारली ‘चला स्वच्छता करुयात’. या एका हाकेवर हा चमत्कार घडला हे पाहून माझा गावावरचा विश्वास दुणावला.
Sunday, September 19, 2010
पर्यावरणीय गणेश उत्सव
या सगळ्या उपक्रमांमधले काही अनुभव.
7-8 वर्षांपासून गोवर्धन गावातली काही मुलं मातीच्या गणेश मूर्ती बनवतात. निर्मल ग्राम निर्माण केंद्रात ही कार्यशाळा होते. नंतर सर्वजण आपापल्या मूर्ती घरी नेऊन बसवतात. पूर्वी हे गणपती शाडूच्या मातीचे बनवायचो. मात्र तिला काही स्थानिक पर्याय शोधावा असा विचार आला. मग शेतातली काळी माती आणि शेण एकत्र भिजवून, मळून त्यापासून मूर्ती बनवू लागलो. ते साध्या पोस्टर कलर्सने रंगवतो. जसजसा सराव झाला तसा मुलांच्या मूर्तींचा आकार वाढू लागला, मूर्ती अधिक सुबक, देखण्या होऊ लागल्या. शिवाय स्वत: बनवलेला गणपती घरी आणून बसवण्यातला आनंद वेगळाच !
पर्यावरणीय विसर्जन
गावात ज्यांच्या मूर्ती मातीच्या आहेत असे बहुतेक सर्वजण अनंत चतुर्दशीला विसर्जनासाठी एकत्र येतात, गणपतीच्या मूर्तींचे मोठ्या ड्रममध्ये विसर्जन करतात. जिथून मूर्ती बनवण्यासाठी माती घेतली तिथेच ती पुन्हा मिळते !
निर्माल्य दान अभियान
निर्मल ग्रामकडे येणारा रस्ता पुढे गंगापुर धरणाकडे जातो. रस्त्यात नदीवर एक पूल आहे. नाशिक शहरातली अनेक गणेश मंडळे, कुटुंबं गणपती विसर्जनासाठी येतात. मूर्तींसोबत १० दिवसांचे निर्माल्यही नदीत सोडतात! गेल्या वर्षी आम्ही सर्व रस्त्यावर थांबलो आणि येणार्या गाड्यांना आडवून लोकांना निर्माल्य आमच्याकडे देण्याचे आवाहन केले. खूप छान प्रतिसाद मिळाला 'निर्माल्य नदीत टाकून नदीचे व निर्माल्याचेही पावित्र्य कमी करू नका, आपले निर्माल्य वृक्षदेवतेच्या चरणी अर्पण करण्यासाठी दान करा' असे भावनिक आवाहन करणारी पोस्टर्सही लावली होती. आम्ही फक्त तीन - साडेतीन तास हे काम केलं पण प्रचंड निर्माल्य जमा झालं.
हा कार्यक्रम खूप ऐनवेळी घेतला. त्यामुळे निर्माल्याचें लगेच वर्गीकरण करणे शाक्य झाले नाही. या सर्व निर्माल्याचे ख़त करायचे होते, पण दुसर्या दिवशी जेव्हा त्याचं वर्गीकरण केलं तेव्हा त्यात काय काय निघालं ?
१. पानं, फुलं, दूर्वा इ. - ३०० किलो.
२. नेवैद्य / प्रसाद - २० किलो
३. नारळे - ३९
४. खोबर्याच्या वाट्या - ३०
५. धान्य - २ किलो
६. फळे - १५ किलो
७. वस्त्रे - ४५
८. प्लास्टिक - २५ किलो
९. देवांचे फोटो
१०. मातीचे बैल
११. मूर्ती
१२. कापराच्या डब्या, अत्ताराच्या बाटल्या, वातींचे पुड़े, कात्री, चाकू, टूथब्रश
ही यादी पाहिली आणि आपण किती बेजबाबदारपणे या सर्व गोष्टी नदीत टाकतो, याचा प्रत्यय आला !! आपल्याकड़े धान्याचा तुटवडा असताना, आपण खाऊ शकू आशा वास्तु, ताजी फळं हे सगळं सरळ नदीत टाकतो? आपल्या धार्मिक संकल्पना काय आहेत? असे प्रश्नही पडले! आणि एवढा तरी कचरा आपण नदीत जाण्यापासून वाचवला याचं सगळ्यांनाच खूप समाधान वाटलं !
यंदा हे अभियान अधिक मोठ्या स्तरावर घ्यायचे आहे. आपण सगळेच यात सहभागी होऊ शकतो, आपापल्या भागात अशी अभियानं राबवू शकतो. बर्याच ठिकाणी मूर्ती दानाचेही उपक्रम राबवले जातात. त्यांच्यात सहभागी होऊ शकतो. नदी वाचवणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे !!
-मुक्ता नावरेकर,
Monday, January 18, 2010
कुमार निर्माण निमित्त
-मुक्ता गुंडी
Wednesday, December 23, 2009
यमगरवाडी बद्दल थोडंसं!!
भटके विमुक्तं विकास प्रतिष्ठातन (BVVP) गेल्या 14 वर्षांपासून विविध समाज प्रश्नां वर काम करते आहे. प्रतिष्ठारनच्याव विविध प्रकल्पांवपैकी यमगरवाडी प्रकल्पव (केशवनगर विद्या संकुल) हा महाराष्ट्राशत उस्मानाबाद जिल्ह्यात, तुलजापूरजवळ नांदुरी येथे राबवण्यात येतोय. हा प्रकल्पं 1993 मध्येण 18 एकर जागेवर श्री रमेश छटुफले यांनी दिलेल्या जमिनीवर 25 भटक्या मुलांना घेऊन सुरु झाला. आज गिरीश प्रभुणे या कल्पाक आणि खंद्या कार्यकर्त्यामुळे यमगरवाडीला निवासी शाळा सुरु आहे. या शाळेत 400 मुले आणि 200 मुली शिकत आहेत. या शाळेत मुख्यित्वेम पारधी समाजातील मुले आहेत. या उपेक्षित समाजातील पालकांमध्येआ जागृतीचं काम करणं, त्यांहच्यात मुलांना एकत्र करुन शिक्षण देणं हे एक आव्हातनात्मचक कार्य आहे, जे गिरीश प्रभुणें करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच मी अहमदनगरला एका शिबिरात गेलो होतो आणि तिथं मला गिरीश प्रभुणे यांच्या कार्याबद्दल माहिती मिळाली. त्यांाचं कार्य समजून बघणं, समजून घेणं आपल्याचला जमेल त्याक वेळात करायचं असं मी ठरवलं होतं.
आणि नेमकं 15 तारखेला माझा मित्र राजन याचा मला फोन आला की, “यमगरवाडी हा एक अनाथ मुलांकरता (पारधी समाजातील) प्रकल्पत चालतो. तेथील काही मुलांना दरवर्षी दिवाळीकरता पुण्यापत वेगवेगळ्या इच्छुरक लोकांकडे (2-2 किंवा 1-1 मुलांना) रहायला पाठवलं जातं. तर तू तुझ्याकडे एका मुलाला घेऊन जाशील का?” असा मित्राचा प्रश्नय ऐकताच मनात होकार देण्यााची खूप इच्छा् असूनही मी “नाही” म्हीटलं कारण मला त्यामच काळात वाईला जाणं आवश्य क होतं. त्यायवर तो म्हलणाला, “हरकत नाही मात्र ज्यावेळी या मुलांची सहल निघणार आहे त्याहवेळी या मुलांसोबत त्यांणच्याहकडे बघायला म्हजणून नक्कीस ये”. मी “हो” म्हेटलं.
सहलीला निघेपर्यंत माझी अशी कल्प्ना होती की असतील 20-25 मुलं. पण जेव्हाण 20 तारखेला आम्हीी सगळे रात्री एकत्र जमलो तेव्हाप मला कळालं की एक नाही दोन नाही तब्बाल 82 छोटी (43 मुलं आणि 39 मुली) मुलं होती. मला क्षणभर भीतीच वाटली की आता आपलं कसं होणार? एक तर लहान मुलाला सांभांळणं किती जिकिरीचं काम असतं. आणि आपला तर अशावेळी गोंधळच होतो, इथं तर 10-11 वयोगटातली ही मुलं, कसं सगळं सुरळीत पार पडणार ?
20 तारखेला मध्यारात्री 1 वाजता आमची सहल निघाली. सहलीला निघताना मुलं ज्यान पध्द तीनं ऐकत होती, सूचना पाळत होती, लहान मुलांची मोठी मुलं काळजी घेत होती ते सगळं पाहून माझी सुरुवातीची भीती पळाली आणि खात्री झाली की आता सहल छानच होणार. या मुलांमध्ये राहिल्यामुळे वयानं मोठ्ठे ही माझी संकल्परनाच बदलली. खरंच मोठं कोण? लहान सहान कारणांवरुन भांडणारी मोठी माणसं ? की दुस-याला आपला त्रास होऊ नये म्हलणून समजून घेणारी, समजूतदारपणे वागणारी ही लहान मुलं ? (सॉरी, खूप मोठ्ठी मुलं! )
आम्ही 21 तारखेला सकाळी चिपळूण येथे पोहोचलो. माझं हे स्पमष्टीवक्तेपपण कदाचित वाचणा-यांपैकी काहींना आवडणार नाही पण सहलीचं आयोजन चांगल्याा पध्दनतीनं केलं गेलं नाही हे लगेच प्रत्ययास आलं. कारण चिपळूणमध्येे कोणाकडे जायचं हेच नीटसं माहीत नव्हेत. आम्हीे अर्धा तास फिरत राहिलो. शेवटी चितळेहॉल शोधत एका ठिकाणी गेलो तर त्यां नाही काहीच कल्पधना नव्हणती. मात्र पाच मिनिटं या प्रकल्पाठवर बोलल्यागवर ते म्हटणाले, “मला काहीही अडचण नाही. तुम्हीं इथं थांबू शकता”. आणि त्यांलनी काही पुढं न बोलता पाणी तापायला ठेवलं. ब-याच माणसांना मदत करायची, चांगलं काम करण्यााची खूप इच्छाह असते पण काही वेळा ती मदत मागीतलीच जात नाही असंही मला वाटलं. तसंच कोणत्याी हॉलवाल्या नं 110 लोकांची सोय स्वततःची गैरसोय करुन केली असती? आम्हाय सगळ्यांची त्यांकनी उत्तम व्यआवस्थाव केली.
हे सगळं होताच आम्हायला ज्या चितळ्यांकडे जायचं होतं त्यां चा अखेर पत्ता सापडला. आमच्याहतले निम्मेा लोक आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांनी आमची चहा-नाश्याहो ची सोयही केली होती. पण त्यान चितळे (हॉलवाले) ना हे माहीतही नव्ह त तरी त्यांॉनी आमची सोय केली त्यां चा मला अभिमान वाटत होता. अर्थातच आम्हालला अभिप्रेत असलेल्या चितळेंनीही आमची उत्तम व्यअवस्था केली.
सर्व आवरुन आम्ही 11.30 ला शिवसृष्टीअदर्शन येथे जाण्यास निघालो. मी आणि योगेश यांनी 5 नम्बथर गटाची जबाबदारी घेतली. आम्हाला तसं पहाता काहीही करायचं नव्हमतंच. कारण आमच्या गटात 10 जण होते आणि त्यातला अर्जुन हा 8 वर्षाचा मुलगा हा गटप्रमुख होता. लिडर म्हणजे काय, तो कसा सर्वांना समजून घेतो, सर्वांबरोबर सतत असतो, याचे धडे या लहान मुलांकडून घ्यातयला हवे. शिवसृष्टी दर्शन खूपच छान झाले. मला सारखं वाटायचं की आता ही मुलं गोंधळ घालतील आणि मग मला जरा काम मिळेल. पण नाहीच. संपूर्ण प्रवास मुलांनी गोंधळ केलाच नाही.
माझा स्वगतःबददलचा एक पक्का समज होता की आपल्याकला लहान मुलांसोबत अजिबात खेळता येत नाही, बोलता तर अजिबातच येत नाही. काही प्रमाणात हा समज खरा म्हणता येईल. आणि अनेकदा तसा अनुभवही आला आहे पण...
ही सहल इतकी वेगळी होती. दुपारी मी कागदाच्याक काही वस्तू करायला सुरुवात केली आणि काय... लहान, मोठी सगळीच मुलं मला मला करीत एकच गोंधळ सुरु झाला. मला शिकवा, मला पण... अरे बापरे, कोणाकडेही न जाणारी ही मुलं, हातात कॅमेरा (कागदाचा) घेऊन माझ्याकडे धावत सुटली. पक्ष्यां चे पंख फडफडले आणि मुलांचा पुनश्चर गोंधळ सुरु झाला. कागदाच्याु कोल्ह्या ने मुलांची नाकं पकडली आणि मुलांच्याच चेह-यावर हास्य पसरलं. ओरिगामी शिकवणा-या शाळेतल्याय बाई, माझे वडील, काका, काही मित्र, आणि अनिल अवचट या सर्वांचे मी मनातून खूप खूप आभार मानले. हॅट्स ऑफ! की ज्यांभच्याचमुळे मी मुलांच्यात एवढ्या जवळ जाऊ शकलो आणि मुलंही यामुळं माझ्या जवळ आली.
पण वाईट गोष्ट अशी की माझ्याकडे पुरेसे कागद नव्होते. मला खूपच वाईट वाटलं. मी फक्त काहीच मुलांना कागदाच्याव वस्तू. करुन देऊ शकलो. ज्यांनना मला हे देता आलं नाही त्या चं मला टोचणी लागलीच. पण हेही लक्षात आलं की या अनुभवातूनच शिकायचंय. अनुभवासारखा दुसरा गुरु नाही!
संध्यांकाळी 4 वाजता आम्ही समुद्रावर पोचलो. तिथं खूपच धमाल आली. माझ्यातला गुंडपणा उफाळून वर आला. मी एकेकाला धरुन सरळ पाण्यापत बुडवून काढलं. इतरांवरही पाणी उडवत राहिलो. मुलंही मस्तन मजा करीत होती. गुडघाभर पाण्या च्यार पुढं जायचं नाही ही सूचनाही तंतोतंत पाळत आनंद घेत होती. पोरं वाळूत मनसोक्तआ खेळत होती. शंख, शिंपले गोळा करीत होती. माझ्याकडे कॅमेरा नव्ह ता याचं मला अतीव दुःख त्याक्षणी झालं.
सूर्यास्त तर अप्रतिम होता. इतर ठिकाणांपेक्षा हा सूर्यास्ति पहाणं म्ह णजे एक वेगळाच अनुभव होता. बस्सत, फक्त बघतच रहावं, दूर दिसणा-या होड्या, उडणारे पक्षी, समुद्रात हळूहळू बुडणारा सूर्य आणि त्या्चा लालेलाल तेजस्वी पण बघता येइल असा गोल गोळा...व्वा! काही गोष्टी तर शब्दाडत न पकडता येणा-या असतात....
तिथून मात्र आम्ही रत्नागिरीला मुक्काममाला पोहोचलो. तिथं मस्तम गरमागरम पुरीभाजी, शिरा, भात असं जेवण करुन ताणून दिली. रात्री डासांनी आमच्यारवर भरपूर ताव मारला ही गोष्टग निराळी.
दुस-या दिवशी म्हरणजे 22 तारखेला सकाळी आवरुन आम्हीव 11 वाजण्याच्या सुमारास भरपूर नाश्ता करुन व सोबत जेवण घेऊन बाहेर पडलो. वेळणेश्वबर या प्रसिध्दन टेकडीवरील मंदिरामध्येव जाऊन दर्शन घेतलं. आजुबाजूला डोंगराळ भाग आणि मस्तत जंगलाचा परिसर होता. तिथून आम्हीस गणपती पुळे येथे जायला निघालो. मध्येस वाटेत एक बस बंद पडली. मग काय, तासभर वायाही गेला. रस्याग क त स्वाेमी स्वररुपानंद यांचं मंदिर होतं, तिथंही जाऊन आलो. गणपती पुळ्याला पोहोचलो तर उन प्रचंड पडलं होतं. आणि भूकही चांगलीच लागली होती. आणि समुद्रही एकीकडे खुणावत होता. पण आधी जेवण, मग थोडी विश्रांती आणि नंतर समुद्र असा प्राधान्यिक्रम ठरवून आम्ही त्यादप्रमाणेच कृती केली.
मी तर समुद्रावर खूप फिरलो. पाण्या तून विचार करीत करीत इतका चालत गेलो की किती दूर गेलो आहोत याचा अंदाजच आला नाही. आत्ता असं लक्षात येतंय की समुद्राचं हे वैशिष्ट्य च असावं की त्या् पाण्यामतून आपण पुढे चालताना कळतच नसावं. कारण लाटा अलगद आपल्या पायावर येतात, हळूवारपणे आपल्याा पायाखालून वाळू नेतात. परत एक नवीन लाट येते आणि तिच्याअसोबत थंडावा देणारी एक झुळूकही आणि त्याय येणा-या धुंदीतच आपण चालतच रहातो. कितिक वेळ...
जवळपास अर्धा तास चालल्यायवर मला आपण दूरवर आल्यासचं लक्षात आलं. तिथून मंदिर अगदीच छोटं दिसत होतं. आणि परतण्यासाठी फक्त 15 मीनिटं शिल्लक होती. हे लक्षात येताच मात्र मी पाण्याितून अक्षरशः पळत सुटलो. पण पाण्या तून सावकाश चालणं जेवढं आल्हाणददायक तेवढंच पळणं मात्र तापदायक...पण करतो काय ?
धापा टाकत परत पोहोचलो सगळी निघायच्या बेतात होती. मी हुश्शत केलं आणि पुढच्यार वेळी घड्याळाकडे लक्ष ठेवायचं असं मनाला बजावलं. या सगळ्यात जेवण, विश्रांती गेली याचा मात्र जराही पश्चाणताप झाला नाही. कारण माझी ही समुद्रफेरी खूपच छान झाली. (हं बरोबर सोबत कोणी असतं तर अजून खूपच मजा आली असती हेही तितकंच खरं...)
आणि 5 वाजल्यांपासून परतीचा प्रवास सुरु झाला. जरासा कंटाळलोही. मात्र मला गाडी चालवणा-या ड्रायव्हलरकाकांचं खूपच कौतुक वाटलं. दोन दिवसात जवळपास 18-20 तास त्यां नी ड्रायव्हिंग केलं. एक रात्र तर संपूर्ण जाग्रण केलं पण जराही कुरकूर नाही की तक्रार नाही. उलट म्ह णाले, मुलांकडे बघून थकवा येतच नाही. उलट उत्साकह येतो. मी त्यां च्या शी चांगल्याेच गप्पाबही मारल्याव.
या संपूर्ण प्रवासात मी कितीतरी गोष्टीय शिकलो. काही शब्दाीत सांगता येतील आणि काही सांगताही येणार नाहीत अशा... नाव पुढे पुढे न करता नावाशिवाय कामं करणारी, श्रेय न घेणारी, काम महत्वा्चं मानणारी, मुलांच्या आनंदाकरता काम करायचं बाकी गोष्टींवचा बाऊ न करणारी माणसं बघितली. लहान वयात हेवेदावे, भांडणं विसरुन मोठी झालेली मुलंही बघितली. छोट्या छोट्या गोष्टीित आनंद मानणारी मुलं बघितली. आणि विचारात पडलो की आपण तर असं काहीच करत नाहीत. घरात 10-10 जोड कपडे असूनही दिवाळीत नवे कपडे घेतोच, मोठ्या भावाला जास्ती फटाके आणले म्ह,णून भांडणारे भाउ, फराळाला लाडू केले नाही म्हरणून आईवर चिडणारी मुलं हे सगळं कुठे आणि एक चॉकलेट मिळालं की आनंदात त्याआ चॉकलेटच्याम कागदाचीही वस्तू बनवण्याडस उत्सूक असलेली, कोणाच्यातरी कुशीत प्रेमानं झोपता आलं म्हंणून, प्रेमानं कुणी थोपटलं म्होणून आपल्याच ताई-दादांचं ऐकणारी, लहानलहान गोष्टींत सुख शोधणारी ही मुलं कुठे आणि...
पुढच्या दिवाळीत कमीत कमी 5-6 मुलांना तरी मी माझ्या घरी घेऊन येणार हे नक्की, असं ठरवूनच मी सुखानं झोपेच्या स्वाधीन झालो.
-सिद्धार्थ प्रभुणे
Tuesday, December 22, 2009
माहितीचा अधिकार आणि मी
धान्याधारित मद्यार्कनिर्मितीला प्रोत्साहन देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे हे कोणालाही पटेल. दारुमुळे बेचिराख, उध्वस्त होणारी माणसं, संसार दिसत असताना सरकारनं दारु निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सबसिडी द्यावी हे योग्य नाही. एका बाजूनं ग्रामपातळीवर दारुबंदी योजना मांडायची आणि दुस-या बाजूनं फक्त काही धनदांडग्या राजकारण्यांच्या स्वार्थासाठी अशा प्रकारच्या योजनांना सबसिडी देउन त्यांना आणखी धनवान करायचं तेही सर्वसामान्यांच्या पैशातल्या करांतून हे पटत नाही.
ही सबसिडी देण्यामागची सरकारची भूमिका अशी आहे की, ‘गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्यात ज्वारीचं दरएकरी उत्पादन व ज्वारीच्या पिकाखालील एकूण क्षेत्रकमी होत आहे. या सबसिडीमुळे दारुच्या निमित्ताने ज्वारीचं उत्पादन वाढेल व शेतक-यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल आणि विदर्भ-मराठवाडयातल्या शेतकर्यांच्या आत्महत्या कमी होतील.’ खरं पहाता, विदर्भ-मराठवाड्यातील ज्वारी, बाजरी इ. पिकांचे उत्पादन कमी असण्यामागे सिंचनाचा अभाव, नवीन तंत्रज्ञान, बी-बियाणे यांचा अभाव ही काही प्रमुख कारणं आहेत. द्यायची सबसिडी तर शेतक-यांना द्या. दारुउत्पादकांना का ?
तसंच धान्याधारित मद्यार्क निर्मितीतून किती प्रमाणात पिण्यासाठीची दारु व औद्योगिक वापरासाठीचे अल्कोहोल तयार व्हावे यावरही सरकारने काहीच नियंत्रण ठेवलेलं नाही. यावरुन हेच स्पष्ट होतं की सरकारमधील काही स्वार्थी राजकारण्यांसाठीच ही योजना साकार झाली आहे. सर्वसामान्यांना या योजनेपासून होणा-या दूष्परिणामांना तोंड द्यावं लागू नये यासाठी आपण एकत्रितपणे विरोध केलाच पाहिजे. आणि यासाठी आपल्या हाती एक मोठं शस्त्र आहे. ते म्हणजे माहितीचा अधिकार यानेके RTI !
माझा आरटीआयचा अनुभव ऐकायचाय?
सचिनच्या सांगण्यावरुन 7 नोव्हेंबरला मी धान्याधारित मद्यार्क निर्मितीच्या राज्य उत्पादनशुल्क विभागात आरटीआयचा अर्ज दाखल केला. मला अगदी मनापासून सांगावं वाटतं की अर्ज दाखल करताना मला आरटीआयविषयी काहीही माहिती नव्हती. त्या दिवशी पब्लिक इन्फर्मेशन ऑफिसर हे उपलब्ध नव्हते. मी अर्ज तर दाखल केला आणि वाटलं आता 30 दिवसांत कधीतरी उत्तर येईल. तत्काळ उत्तराची अपेक्षा नव्हतीच.
दोन-तीन दिवसानंतर एका सायंकाळी मला माझ्या मोबाईलवर माहीत नसलेल्या व्यक्तीचा मिसकॉल दिसला. कोणी केला असेल या कुतूहलापोटी मीही मिस कॉल पुनश्च त्या नंबरला दिला. आणि लगेच मला त्या नम्बरवरुन कॉल आला. ती व्यक्ती बोलत होती, “आपण वाकळे ना ? मी उत्पादनशुल्क विभागातून पब्लिक इन्फर्मेशन ऑफिसर पुजलवार बोलतोय. तुम्ही दाखल केलेल्या अर्जाविषयी बोलायचंय....” मी तर एकदम गोंधळूनच गेलो. इतक्या लवकर प्रतिसाद आणि तोही असा एकदम मोबाइलद्वोर म्हणजे मी कल्पनाही केली नव्हती. कसंतरी स्वतःला सावरत मी त्यांच्याशी बोललो. आमची भेटीची वेळ ठरली. त्यांच्याकडे जी कागदपत्रं आहेत ती मी जरुर बघावी असंही त्यांनी सुचवलं.
सरकारी अधिका-याच्या या सौजन्यशील आणि तत्काळ प्रतिसादानं मी जाम सुखावलो. खरंतर त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे असंही मला वाटलं. आणि मी दुस-या दिवशी छानशी टवटवीत अशी दोन गुलाबांची फूलं घेऊन त्यांच्या भेटीला गेलो.
दुपारी एकच्या सुमारास मी त्यांना भेटलो. त्यांचं अभिनंदन केलं. मी देऊ केलेली फुलं त्यांनी मनापासून स्वीकारली. पुजलवार हे अधिकारी वयानं 40 ते 45 च्या आसपास असावेत. त्यांच्याकडील पद हे प्रभारी स्वरुपाचं होतं. त्यांनी सरळ मुद्याला धरुनच बोलणं सुरु केलं. ते म्हणाले, “तुम्ही विचारलेली सगळी माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही ती मुंबई आणि कारखान्यांकडून मागवावी लागेल. पण सध्या काही प्रकल्पांची कागदपत्रं आहेत. ती तुम्ही पाहू शकता”.
मी त्यांनी दिलेल्या फाईल्स बघितल्या. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या आदित्य ब्रेव्हरिजचं भेंडोळे इथे उत्पादन सुरु झालं आहे आणि प्रणव ऍग्रोटेक यांचंही उत्पादन सुरु होणार आहे.मी त्यांना सध्या उत्पादन घेत असलेले आणि मंजूरी मिळालेले कारखाने यांची कागदपत्रं मला हवी आहेत असं सांगितलं. तसंच उत्पादन सुरु नसलेल्याही कारखान्यांची कागदपत्रं मिळावीत असं सांगितलं. त्यांनी मला त्या कागदपत्रांच्या फोटोकॉपीज दिल्या.
माझ्याशी त्यांनी गप्पाही मारल्या. मी त्यांना लोकसत्तामधली बातमी दाखवली. पण त्यांनी विशेष उत्सुकता दाखवली नाही. येत्या 2-3 दिवसांत मी राहिलेली कागदपत्रं देतो असं त्यांनी सांगितलं. कामासंदर्भात ते काही वेळासाठी बाहेर निघून गेले.
त्यांच्या कार्यालयातील एक सहकारी धुमाळ यांच्यासोबत मी बसलो. मनात विचार करीत होतो, येताना नाही म्हटलं तर एक भीती घेऊनच मी आलो होतो. काय बोलायचं, काय मिळवायचं याचा हिशोब मनात करीत बसलो होतो. इतक्यात समोरनं दोन पोलीस आले आणि ते धुमाळांशी काही बोलू लागले. माझ्या मनात भीतीनं जास्तच ठाण मांडलं. मला एकाएकी 6 नोव्हेंबरला इंडियन एस्प्रेसमध्ये आलेली बातमीच आठवली. 42 harassed; many in jail for seeking into under RTI in Bihar… आठवून अंगाला कापरं सुटलं. वाटलं पुजलवारांनी हे पोलीस आपल्यासाठीच तर नाही ना पाठवले. पण ते सगळे माझ्या मनाचेच खेळ होते. पोलीस धुमाळांशी बोलून निघून गेले. आणि अर्ध्या तासानंतर मला राहिलेल्या कागदपत्रांची झेरॉक्स मिळाली. बाकी माहिती मला 2-3 दिवसांनंतर मिळेल असं त्यांनी सांगितलं हेातंच. मी निघताना झेरॉक्स कागदपत्रांच्या पैशांविषयी विचारणा केली. पण त्यांनी ते घेतले नाहीत. मी मिळालेल्या कागदपत्रांसहित बाहेर पडलो.
असा माझा आरटीआयचा अनुभव मजेशीर राहिला. मला त्यातून माहितीच्या अधिकाराविषयी बरंच शिकायला मिळालं. खरं सांगायचं झाल्यास माझ्यातल्या एका सामान्य नागरिकाला माहितीच्या अधिकाराची ताकद किती आहे याचा एक छानसा अनुभव आला.
अधिक माहितीसाठी: www.foodtoalcohol.wordpress.com
-अमोल वाकळे
Saturday, September 5, 2009
Swimming with the Fish
I was sitting amidst a bunch of 7-8 unknown women in a small house, in village called ‘Nagari’.
Each one was talking with other very loudly. Sitting there I was recalling Nayna’s (Dr. Abhay Bang) words.
The same morning Nayna had opened the first session of Nirman 2.3 Camp with the sentence now familiar to us; “What you get from outside is training but what happens inside is learning”. With this sentence our Nirman Journey had started. Nirman is a series of four camps, an initiative by Dr. Abhay & Rani Bang to sensitize youth to social problems and to encourage them for action. This camp was the third of the series.
In first camp we learned about ourselves, our body. Second camp introduced us to various societal problems like energy, alcoholism, terrorism, rationing; by people who actually worked on them.
And now this was the third one. It was now time to experience what we had learned. All of us had assembled at SEARCH, Gadchiroli from different parts of
“You are going to village to learn about it, by living with it.”, Nayna continued. “You will see entire universe in that small village.
Even if I am able to understand one person on this earth, I will understand entire mankind. That person is none other than me.
See how 60% population of
I was recalling all this as I was not able to become a part of the conversation going on around me.
Where do I start? How do I break the ice?? “I am grotesque at communicating with strangers.” I said to myself, irritated.
Wife of Arogyadoot of SEARCH whom I had contacted after reaching the village had come to drop me here. This was the place where I was going to stay for next four days. I had taken bus from Gadchiroli to
When we entered the house, it was empty. I and the wife of the Arogyadoot sat in verandah. The lady of the house, Kaki, had gone to their farm. She would return only in the evening. After five minutes her two daughters appeared on the scene. The younger one, Peeru, was about 18-20 years old. The elder one, of age 22-23, was mentally challenged. To my surprise, her name was Nirasha. In Marathi, Nirasha means disappointment, no hopes! Later I learned that when Kaki was pregnant with Nirasha, she was expecting a boy. And since a girl was born, everyone was disappointed. Hence the name Nirasha.
After some time curious faces started popping up at the door. I had seen these faces staring at me when I was walking down the village.
Within first half an hour my first round of interrogation was over. Where do I come from? What was my name? Why did I come here? What was my cast? How much had I studied? etc.
Endless stream of questions started fading gradually. Now that they were busy talking amongst them, I busied myself in observing the house.
It was about 400 Sq Ft, with 3 rooms. It was plastered with mud and had Mangalore tilled roof which leaked when it rained. Light and ventilation was a major problem. The open verandah had a chullah. The house had toilet and bathrooms, but they didn’t have doors. The water closet of toilet was closed with Mangalore tiles. Later I saw that no one in house ever used that. Next to verandah, there was a cattle shed. They had one buffalo, two calves, two goats and lots of hens and chickens. Other than two electric bulbs, there was no gadget which ran on electricity. I had learned concept of ‘minimalism’ in Architecture, now I was seeing it.
Time was refusing to move ahead. I had nothing with me to kill time. No book, no TV, no internet, no mobile phone. We had to leave all the valuables at SEARCH. We had left with money just enough to go and come back.
Unknowingly I started comparing my and their lifestyles. I was a typical middle class girl from a metro city, and this was a typical house from village. Soon I realized, there could not be any comparison.
You can’t compare apples and oranges.
Our problems were…well…Pune didn’t have enough of water supply. These people didn’t have water connection. They had to get drinking water from a well which was around half kilometer from their place. Pune had too much of traffic. These people didn’t have vehicles.
Had it not been for this camp, I would never have had a chance to see this kind of living.
Kaki came back in the evening. I introduced myself. They were a family of seven. Five daughters, Kaka and Kaki. Kaka stayed in nearby village. He was watchman with forest department. He came once or twice in two weeks. 3 of the elder daughters were married. Kaki and the younger daughter Peeru looked after the farm. They had 2 acres of land. Paddy was the main crop. They consumed whatever they produced. There was never a surplus to sell.
Kaki soon got busied in cooking. They had a stock of wood for a year. I was seeing cooking on chullah for the first time. In Environmental Planning we learned about the problem of indoor air pollution and now I was seeing Kaki, coughing because of smoke, her eyes red.
But apart from this problem and problem of light and ventilation in house, their lifestyle was the most Eco-Friendly. I had learned terms like Zero Waste House, Carbon Friendly House; I could actually see all that here. Typically waste produced in one activity would get used in some other activity. The food remains would be given to the buffalo, ashes of the chullah would be used to clean utensils, the house was built with local material, the cow dung would be used for surface preparation of the floor….. there were many such interesting loops…
They all would get up at 5.30, would go open air to defecate. Cooking was done by 8 o’clock in morning, one subji and rice. Then they would eat and go to farm at 9 o’clock. In morning they worked as laborer in someone else’s farm. Being a woman, Kaki and Peeru got daily wage of Rs 30. Men got Rs 60. Nirasha never went on farm. She mostly did household work. The two of them would be back by 1 in afternoon. Then they would take bath, washed clothes then had lunch of same subji and rice. After lunch they went to their own farm. At this time, paddy field bunds were being constructed and toor was being sowed on the bunds. They would come back by 6. Cook and have diner. All went to sleep by 9.
Same routine every day.
I told Kaki that I wanted to try my hand on farming! She told me since in morning they worked as laborer in some other farm, its better I accompany them after lunch. I agreed.
After Kaki and Peeru left, only I and Nirasha were there. Once again I encountered the slow pace of time. “I should have got some book!” I cursed myself.
It was the first day of my stay and I was not able to set myself with this life yet. Kaki and all the other ladies seemed very confused about why exactly I was there.
They had immense curiosity about urban people. But they had very less exposure to the urban luxuries. They asked me questions like ‘Do you also do farming in city? Do you have cows at your place? How big is Pune? Is it as big as Gadchiroli? Is it twice the size of Gadchiroli? You must be having water from taps, you must be cooking on LPG…..’
Seeing this life I thought I belonged to some other planet. All the malls, ATMs, multiplexes, glass towers of corporate….all seemed so irrelevant here!!
Why am I here??? I started thinking again. What am I going to do to change these people’s lives? Will I ever be able to leave city and stay here forever?? Do I have any capabilities to survive here?? The thing is, I know that it is a game of 4 days. Will I be as much patient if I wasn’t to return after 4 days?
Why should I allow myself to think that I am educated? I don’t know farming, I don’t know how to even light chullah, let go cooking on it, I don’t know how to milk cow….. I was the most unfit to survive there.
In afternoon I joined them on farm. We sowed toor.
Two hours of work. My back started aching. I was drenched with sweat. But it was fun. One could see fields stretched for miles in all directions. Very beautiful!
In the evening I went with Peeru to fetch water.
She gave me a large Handa (utensil to store water) to fill. It was heavy. Since I was quite sure that I will drop it if I carried it on my head, I took it in my hands. By the time we reached the chowk near Kaki’s house, I was dripping with water. The Handa was wet and it was slipping from my hands.
And……at one point of time my hands could not take that weight anymore and the thing dropped….. almost 30-40 people in the chowk were watching. Within split second there was a roar of laughter. I was standing right in the middle not knowing how to react!! It was one of the most embarrassing moments of my life. The very incident later became a huge entertainment package for everyone. Now I can laugh at it, but at that time…it was really tough!!
The next morning when people were coming to buy milk from Kaki, each and every person knew the water story. In village nothing is private. Everything is public.
Typically in afternoon ladies gathered at Kaki’s place for chatting, gossiping. They were still not understanding the purpose of my visit. They were under impression that I had come there to do some survey. And the fact that I wasn’t doing one was drawing objections.
Alas I tried to explain. I told them, “See, we people in cities get all the food from stores. We never get to know about the hard work that a farmer has to do to produce it. That is why SEARCH has sent us. To see how difficult the life of farmer is.”
That’s it. That worked like a key. The communication was unlocked, the ice broken.
Their attitude changed drastically. All the traces of disapproval because I was an urbanite dissolved. They started sharing their problems. Kaki said, she wanted Peeru to get married to a person from service sector. “I have been working hard all my life. But I don’t want Peeru to have a life like me. I want her to have a comfortable life.” But person from service sector meant more dowry. What’s more, if your girl had dark complexion, the dowry amount would increase!! I asked Kaki, how did they manage to get 3 girls married? They must have paid sizable amount of dowry. “We borrowed from our relatives, friends…” Kaki told, “….and we are still paying back. Till we clear previous debts, we can’t get Peeru married.” “And what about Nirasha?” I asked. “She will stay at our place, what can we do? After us one of the daughters will have to take care of her.” I was surprised about the maturity with which this issue was handled. They had accepted her so naturally, without any noise.
Since there was no man in house, ladies of all ages would often drop in for while. Since Peeru and I were of similar age, I could see life of women and girls in village very closely. They seemed quite insecure. You will never see a girl roaming alone in that village. They would always go in group. Kaki never encouraged me to step out of the house alone. It was one of those few times when I am aware that I am a ‘Girl’.
Story of all the girls of Peeru’s age was more or less similar. They would learn till 10th, at the most 12th. Then join their parents in farming and soon would get married. I really doubt of what use that education is for them.
But they didn’t seem to have any complaints. They had accepted that this is what their life was about. And it would never change. For all of them, the fact that I had come all the way from Pune to Gadchiroli for camp, was hard to believe. I tried explaining about my graduation in Architecture and Post Graduation in Environmental Planning, but they were worried that I am 25 and still not married!!
In next two days I went to many ladies staying nearby. Now they were more or less knowing me. Everywhere it was a warm welcome. I was going with Kaki on her farm everyday.
Slowly I could match their pace of life, yet when 4 days were over, I was eager to return to SEARCH, to my friends. Each one had different experience. People had bunch of things to share.
After the prayer, the laughter & the talk started. Hosts of some Nirmanees made them work like anything, some of them got marriage proposals, some were mistaken as naxalites, two were attacked by wild boar… the list was endless!! An hour was passed with roars of laughter. Slowly the paradoxes of life which were witnessed by all of us started surfacing. Alcohol, tobacco were chronic problems. People had seen children of age 3 eating tobacco. Castism was not only present but dominant in all the villages. Committing yourself to one person, the very basis of institution of marriage was nonexistent. It was a shock to hear some of the facts narrated by people. In many places ill effects of urbanization have reached even before urbanization. Is it the Indian Culture that we are so proud of?? Everyone was asking. The romantic concepts about Indian villages were completely broken. Everyone had seen the reality and now it was difficult to run away from it! Everyone was equally clueless about his or her role in changing that picture.
The next day we had a session for sharing the experiences. After listening to them I felt what I had seen was enough to put together only one or two pieces of a huge jig-saw puzzle! Even if we combine all the experiences, that would give only a glimpse of that huge picture.
After that session we were to pen down the questions that arose in our minds. My first impression after coming back was that I had understood village to some extent. When I heard experiences of rest of the people, I understood what I saw was not enough. I could see a complex web of problems. Where do I fit in this web?? What is my role?? Where to start?? Is it really possible to isolate one problem and solve it?? Will I be able to leave my present lifestyle and go to villages for working? Will I want to go in the first place?? And my basic question was ‘In four days how much of village have I really understood?’
The problems of villages were not just one or two issues, they were deep routed. I think the real problem was, those people didn’t have a vision for their life. I am not talking about vision of money or material gains. A good life is about living it a good way. Once they have this vision, they know what to achieve rest are just tools. Then it won’t be a fragmented approach to solve problems one by one. First their thinking should change. In this context I think swadhyay has a very fundamental answer. It helps you change your vision about your life. This sets a momentum, and then you yourself find ways and means to achieve better life. But that vision is the key.
This is what our group suggested in the manifesto of
We also did a role play on “Na aane ke bahane”, list of all our excuses for not working on the problems. We had to face the fact that what we call reasons are in fact excuses!!
Today I am back to my own life and I can’t help but compare. Today whatever life I have, what my contribution to it? Frankly- Nil. I was fortunate enough to born in a good house, to get good education, to get ability to think, to choose between right and wrong. Today if I am in the category of ‘Haves’, it is my duty to help people in category of ‘Have nots’. We always ask ‘Why not me?’, but how often do we ask ‘Why me?’
But in today’s life we just don’t have time to take a brief pause, and think about it. I was saying that the village people didn’t have vision for life. Do we, city people have?? Or our vision has started to mean only money… consumption??? Are we selling our sensibilities, sensitivities? Are we really worthy of the resources that we consume? Do we have right to take things for granted???
I don’t have answers at this moment. But I plan to keep looking for them. And even if I am able to change my lifestyle by 1%, I would say I proved myself worthy of that visit.
-Amruta Pradhan
Decision: Freedom to Choose
There were a few reasons as to why I picked the other option…
1. Having studied Information Technology at my graduation level, I was rather I still am very curious to know what actually goes into the Industry. How people in the corporate world work, why do they work, what they expect from their field of work, how and why they have gotten into it, how passionate they are about their work, how do they maintain a work life balance and lots more...through interaction and introspection. I am pretty sure I wouldn’t have been able to know all this unless I would be here and do that.
2. Money is another important aspect. I have always wanted to know how much money I need to earn. I could have easily accepted a certain sum of money and defined my lifestyle but I needed to know how much money is more money. And I think a lucrative job was the easiest source.
3. I also wanted to truly learn on the technology front. I didn’t know how we would apply what we learnt in our graduation years.
I feel I needn’t justify my reasons for having chosen this option. However I am trying to put across what went through my mind when I made the decision. There is a whole lot of learning that roles in with the decision. After all people working in corporate are also people and even smart people.
Before I joined the firm I had thought that when I leave the company I should feel happy that I am saying good bye and not repent later in life that I didn’t try this in life. It sure has been a rare experience so far… I am going to be working along for another 8 months or so….to get a real time project experience how processing happens and how development actually takes place. Of what I have come across till now all industries have a very efficient system in place. It surely is not a piece of cake to be reining in oddly 3000 or more people and getting work done in an effective manner. Not all people working are smart or intelligent…but they have their own means of getting work done. You can learn to be a team player… and you also get to realize how much importance your dedication to a particular job is valued.
You must be wondering that for long I have been mentioning just the good stuff…. Frankly speaking now I know that this is not the place that I would want to spend the rest of my life. I feel sad and depressed at the end of day when I don’t know how much or for how long it has “rained outside” i.e. how easily I am weaned away from what’s happening in the world outside. I come to know of the events only late after I have reached home or the next days newspaper People live in fake lives…. they want to be doing lots of stuff other than work but they can’t. They are stuck in the 9 to 6 schedules. And even more to earn a 5% hike at the end of the year. Ultimately, not realizing this wouldn’t give them happiness. I used to always wonder at the number of advertisements that are shown on television that always showcased “weekend homes”, “weekend getaways”,” retirement homes” but I have realized you never actually have time to get a” weekend”. Though here in my company they say “You own your career” yet you feel like you are reined to a carriage and that you are driving the carriage but someone has the leash.
I would like to conclude with a small incident….
The other day I left office later in the evening, at this time of the evening we get cab drops. Apparently that day for some reason a cab that comes to our area wasn’t yet assigned and we were waiting for it to be allocated at the same time it started pouring heavily… and the rains drenched us wet in the 5 minute wait span. I was a little irritated because I was wondering I would have to sit all wet till I reached home. Another guy complained about the same thing to his friend… and pat came the reply from his friend: ”Are yaar kabhi bigh gaya to kya hua vaise bhi ham aaj kal barish mein kaha bhig sakte hain”. And I suddenly realized how I loved getting wet in the rains…..
-Shweta Kulkarni
आनंदानुभव
10 वीच्या सुट्ट्यांमधे मी आनंदवन येथे गेलो होतो. असाच एकटा. नुकतीच दहावीची परीक्षा झालेली. साधना आमटेंच ‘समिधा’ हे पुस्तक वाचनात आलं आणि मी त्यांना पत्र पाठवलं. तर प्रत्यक्ष साधनाताईंच पत्रोत्तर आलं. भेटायला आणि आनंदवन पाहायला ये म्हणून. तसाच निघालो. मनात आनंदवनाबद्दलच्या खूप सार्या कल्पना घेऊन.
आनंदवनाच्या गेट मधून आत प्रवेश केला की उजव्या बाजूला काही अंतरावर एक मोठी ड्रेसिंग रूम आहे. तिथे कुष्ठरूग्णांच्या जखमांना रोज ड्रेसिंग केल्या जातं. तिथे जाऊन पोहचलो. त्या वेळी बायोलॉजीची आणि डॉक्टरी पेशाची मनस्वी चीड होती. म्हणून मग ड्रेसिंग कसं करतात ते पाहायचं आणि जमलं तर प्रत्यक्षात स्वतः करून पाहायचं असं ठरवलं. दुसर्या दिवशी सकाळीच क्लिनिकला गेलो.
ती रूम बर्यापैकी मोठी. चार खाटा ठेवलेल्या. आणि बॅंडेजच सामान. आयोडीनचा वास.खास हॉस्पिटलचं वातावरण. बॅंडेज करायला चारजणं आणि गरज असल्यास इंजेक्शन द्यायला अजून एक. असे पाचजण मिळून आठ-नऊशे लोकांचं बॅंडेज करायचे.
सकाळी 6 वाजता काम सुरू व्हायचं. सगळ्या पेशंटना बॅंडेज करून आपापल्या कामाला जायचं असायचं.म्हणून सकाळी तिथे कायम गर्दी आणि घाई असायची. सगळ्यांनाच कामाला जायची लगबग.
पहिल्या दिवशी सगळं फक्त पाहात होतो.आधीची पट्टी सोडणं, औषध लाऊन जखम धुवून त्यावर पट्टी लावणं. पिवळी आणि पांढरी असे पट्ट्यांचे दोन प्रकार. ज्यांची जखम अजून ओली असेल अशांसाठी पिवळी तर इतरांसाठी पांढरी पट्टी. अनेक जखमा. आणि त्यावर रोज केल्या जाणारं बॅंडेज. काम करायचं असेल तर चालणं आलचं. आणि त्यासाठी रोज पट्ट्या बदलणं देखील.
बहुतेक सगळी म्हातारी नाहीतर चाळीशी पार केलेली माणसं. बर्याच वर्षांपासून आनंदवनात असणारी. तिथेच काही ना काही काम करणारी.
पट्ट्या बांधणं वाटलं तेवढं सोपं नव्हतं. प्रत्येक पेशंटची पट्टी बांधायची विशिष्ट पद्धत असायची. वर्षानुवर्ष पट्टी बांधून तयार झालेली. झडलेल्या बोटांनुसार, ते जे काम करतात त्या कामाच्या स्वरूपानुसार ठरलेली. शेतात काम करणार्या म्हातार्या एक जादा पट्टी सोबत ठेवत. प्रत्येकजण आदल्या दिवशीची स्वतःची पट्टी सोबत घेऊन बसायचा.
पट्ट्या बांधून घेताना त्यांना कसल्या वेदना होत नसत. कारण कुष्ठरूग्णाला त्या भागात संवेदना नसतात. बंडेज गुंडाळताना, ती पांढरी पट्टी घट्ट आवळून बांधावी लागायची. आधी खूप सारा मेडिकेटेड कापूस पायाभोवती गुंडाळायचा आणि मग पट्टी बांधायची. अशी घट्ट बांधली की दिवसभर काम करताना ती निसटत नसे.
कधी कधी जखमेतून छोटे दगड, काचेचे तुकडे असं बरचं काही काढावं लागायचं. शेतात काम करताना पट्ट्यांमधून हे सगळं त्या जखमेत जाऊन बसायचं.
मी नवीन आहे, अजून शिकतोय हे कळाल्यावर तिथल्या म्हातार्या पट्टी बांधताना धीर द्यायच्या. त्यांना पट्टी कशी बांधून हवी ते स्वतःहून सांगायच्या. चुकलं तर ओरडायच्या. नीट जमल्यावर मनापासून शाबासकी द्यायच्या.
मी आणि मोना सोडून ड्रेसिंग करणारे बाकी सगळे कुष्ठरूग्णच होते. ट्रिटमेंट घेऊन बरे झालेले.
सकाळी सहा ते नऊ प्रचंड काम. गडबड आणि धांदल. नऊ नंतर मात्र म्हातारेकोतारे, कामाला न जाऊ शकणारे पेशंट यायचे. सगळं आवरायला अकरा वाजायचे.
ती ड्रेसिंग रूम म्हणजे गडबड, गोंधळ आणि आनंदाचा नुसता कल्लोळ असायचा. ड्रेसिंग करणारं कुणी आलं नसेल तर त्याची चौकशी व्हायची. एकमेकांची थट्टा करत आणि हसतखेळत सगळं काम चालायचं.
रोज काम करून कामात सफाई येऊ लागली. 10-12 दिवस काम केल्यानंतर तर कुणाला कशी पट्टी लागते हे पाठच झालं होतं. पट्टी नीट जमली तर त्या प्रेमळ म्हातार्या खूपच कौतुक करायच्या..आर्शीर्वाद द्यायच्या.
सुरूवातीला वाटायचं, काय ह्या त्यांच्या वेदना..किती हा त्यांना त्रास..रोज पट्टी बदलायची. जखम झाली तर ती चिघळायची. मग काही दिवस काम बंद. असं बरच काही.
पुस्तकातून वाचून डोक्यात बसलेलं दुःख मी त्यांच्यात शोधायला जायचो. पण ही मंडळी तर भलतीच आनंदी असायची. कसलं दुःख आणि कसलं काय? जे झालयं ते मान्य करून जगायची.
प्रत्यक्षात दुःख होतं, वेदना देखील होती. पण या लोकांनी ती खूप सौम्य करून टाकली होती.
एकदा तर एक पेशंट आले होते. बरेच म्हातारे होते. त्यांच्या डाव्या पायाचा अर्धा अंगठा उंदराने रात्रीतून कुरतडून खाऊन टाकला होता.. संवेदना नसल्याने रात्री त्यांच्या लक्षात आलं नाही. सकाळी ऊठून पाहतात तर अंथरूणात सगळं रक्तं. त्यांचं ड्रेसिंग करताना खूप भरून येत होतं.
चार-पाच दिवसात बाबांच्या कानावर ही गोष्ट गेली की जालन्याहून आलेला मुलगा रोज ड्रेसिंग करतोय. त्यांनी मुद्दाम भेटायला बोलावलं. तोपर्यंत त्यांची भेट झालीच नव्हती. आनंदवनाचा सगळा परिसरच एवढा मोठा होता की तो पाहताना सगळा दिवस निघून जायचा. आणि त्यांना भेटायला जायचं दडपणचं यायचं. आपण काही काम करत नाही, तर पहिल्याच दिवशी जाऊन त्यांना कसं भेटायचं अशी काहीशी भावना मनात होती.
मग मी त्यांना भेटायला गेलो. खूप वेळ बोलत होते..काय बोलत होते ते आता फारसं आठवत नाही कारण मी खूप भारावून गेलो होतो. केवढा मोठा माणूस.. काही सुचतच नव्हतं त्या वेळेस.
बाबा त्यावेळेस रोज पहाटे स्ट्रेचरवरून फिरायला जायचे. मला म्हणाले, ‘तूही रोज येत जा’. तिथून पुढे आनंदवनात होतो तोपर्यंत मी रोज पहाटे त्यांच्यासोबत फिरायला जायचो. तो अर्धा पाऊन तास भलताच भन्नाट असायचा. पावसाळी वातावरण, पहाटेची वेळ आणि त्यात बाबांसोबत त्यांचं बोलणं ऐकत फिरणं. सगळच स्वप्नवत.
कुष्ठरोगासारख्या भीषण रोगाशी लढणारी ही माणसं. आता आनंदी असली तरी खूप काही सोसलेली. कुष्ठरोगाचे निदान झाल्यावर घरच्यांनी आणि गावातल्या लोकांनी झिडकारलेली. त्यांची वेदना सारखी असल्याने सगळी एकमेकांना धरून राहायची, सांभाळायची.
बाबा त्यांच्या झडलेल्या बोटांकडे पाहून त्यांना ‘ जीवंत मानवी शिल्प ’ म्हणतात. तेंव्हा त्याचा अर्थ कळायचा नाही, पण आता कळतो.
मी आनंदवनात गेलो होतो तेंव्हा वैचारिक गुंत्यात फारसा पडलोच नव्हतो. आपण काहीतरी वेगळं करत आहोत असंही तेंव्हा वाटलं नव्हतं. सेवेचं सामर्थ्य मला बाबांच्या आनंदवनात शिकायला मिळालं. मला ते खूप भावलं. जवळचं वाटलं. त्या नकळत्या वयात तिथल्या कुष्ठरूग्णांशी मी जोडल्या गेलो. माझा मित्र मला विचारत होता, ‘सध्या जे काम करतो आहेस, त्याची प्रेरणा तुला कुठून मिळाली?’ मागे वळून विचार केला आणि आनंदवनातला हा अनुभव आठवला. कदाचित हीच माझी प्रेरणा असेल..नक्की ठाऊक नाही..प्रेरणेचं नक्की माहीत नाही, पण आनंद आणि समाधान मात्र खूप मिळालं. या अनुभवाने खूप काही दिलं. शब्दांच्या पलीकडचं !
-सागर जोशी
Saturday, June 13, 2009
अनुभव
On last saturday, myself along with Anwar, and Anwar's friends went to an orphanage in Dapodi, Pune. It is located in a slum-like area and run by Mrs Tulve who started it in 2000. On reaching there we had a discussion with Tulve Kaku (or simply Kaku now onwards).
The story goes like this in her words-
"I was in affection with orphan kids from times even before starting the orphanage. Once I saw a small orphan girl raped by somebody and the girl was left on road with her pains. I rushed that girl to hospital but she died in a few days. I was shocked to see this. Then I came across 3 orphan kids and asked an existing orphanage if they could admit the kids. The orphanage refused to admit the girls because girls are needed to be provided with extra social security. I found this weird because that is what purpose of an orphanage is.
So I decided to start an orphanage myself with these 3 kids in the year 2000. I registered it with few other ladies from my colony. Later on, looking at the responsibilities, the rest of the ladies left the work, but I couldn't and didn't want to. I had few conflicts with my family initially but later on my family not only accepted it but encouraged me and started contributing to my work.
There are always days of problems. We had few funds and ourselves not being from elite class, we had to manage our expenses and expenses of the orphanage from my husband's salary at times. In October, I got one more shock. My husband (aged around 45-50) expired in October 2008. It is hard to see him not here with us, but I have to go ahead with my kids."
One might feel that only money is the major problem for running an orphanage. But there is a huge list of problems. There are kids of all age, even some of the kids are brought into the orphanage the very day they were born. To grow up these kids, to look after their education, their eating habits, nourish them emotionally is not an easy task. Also, the distant relatives of the kids rise all of a sudden and take them away without thinking about the kid's education. In that case, she has to convince the kid's relatives, even file a police case at times. The elderly girls have to be given more protection. The problem listed here can be an indication to the actual list.
On asking her where did she apply for any grant from the government, Kaku exclaims "Yes, we did. Firstly they said, I need a bigger place to get a grant for orphanage. If I could get it, why would I ask for a grant? Secondly, they asked for a bribe of Rs 25000. My kids will have their food for 2 months in this sum. Why should I pay the officials so much money just on the belief that they will give grant to my orphanage on some day?"
The place where the kids stay are two small rooms of approx. 10 by 12 feet each. Out of which, one has tin on the top (so one can imagine the summer joy). The number of kids staying there is 34. All of them have to use public toilets and bathrooms of the colony. So one can imagine the "luxury" the kids are having. Kaku stays just next to it in a same sized house.
After visiting the orphanage, many questions arose to my mind. Looking after the orphanage, I was convinced that she is doing it genuinely. She is not running an business NGO as many people do just to earn funding and then abuse that funding. Kaku herself is not "formally" educated. So how did she have the courage to go against family and register the orphanage, handle its administrative and legal formalities? She is also not from elite class. So didn't she feel little worried about the future of her family and orphanage? I stay here in my comfort zones and hardly bother to care about somebody under-privileged, talk about taking "calculated risks" and here a lady who is "illiterate" is taking so much "pain" and responsibility when she is not "needed" to have it? How and why could she do this?
I found that she had an extreme urge to do something for the orphan kids without need of heavy words or heavy philosophy. She had found joy and satisfaction in running an orphanage, that is why after so much apparent pain, she is happy with whatever she is able to do it.
Now, what is that we can do?
1. Monetary help. The orphanage still doesn't have grant. So the expenses of the kids food, education, health are entirely based on donation.
2. Find out what all is required in registering and getting a grant for the orphanage. File RTI, visit officers.
3. Work with Kaku, understand the problems they have in getting grant and work with them to apply and followup the grant approval. But this will need frequent visits, concern for them and committment.
Meantime while we were discussing about the grant issue, Kaku said - "The officials say that we don't have separate toilets and bathrooms for the girls and boys. We cannot do better. The girls and boys have to share the same toilet and bathroom of the colony. Now you guys tell me, do we have 3 bathrooms in our home where 5 people are staying?" I didn't have daring to say her that yes we have and we consider it a necessity :(
-Dhananjay
Tuesday, June 9, 2009
काकू आणि कार्तिक
I visited Orphanage twice this week.
Saturday
When I went on Saturday, construction was going for the top room of orphanage.The roof is made of tin sheets, which becomes unbearably hot during summer and leaks during rainy season. So a new roof is being made. I told Kaku that we can help out with some part of the money.
Kaku said that there was a one year old boy who needs help. I am thinking whether I should take him or not. She asked me,”What should I do? There is no space here and also cannot leave the boy”. I had no other option. I just gave a helpless smile.
Fresh Addition to orphanage
As I had promised Kaku that I will help out in construction. I went to orphanage after office yesterday. Kaku had adopted the baby boy. His name is Kartik and he is very cute. :).
Kaku said,"I had to accept him. What is his fault?"
Unimaginable Problems:-
Kaku said some people were asking for adoption from orphanage. But they were specifically demanding children of age 10-12. She said that later they came to know that there was no one to work for the old parents in the home. So they wanted children more for their house work rather than adoption. Just another form of ‘Child Labour’.
Kartik
Asking about story of Kartik we came to know that, Kartik’s mother is a 20 something girl who got married to a guy. Later she came to know that the guy already had some 10-12 wives. She went into depression and is extremely sick now. She is not in a position to take care of Kartik. I don’t know about the details of her disease and all. She has officially given Kartik to Kaku.
Notable point
In the last two visits only I saw 5 software engineers other than me visiting the orphanage. Good to see people (esp software people) getting connected to at least some problems around them.
Questions that arise in my mind
2. How can she so easily accept other people's faults and love them unconditionaly?
3. There are so many children there yet after so many visits, how come I never see anybody get irritated with children?
4. She is working hard and struggling for children. But she is getting so much of love in return.
She has a very nice purpose for her life. Isn't she also getting many things in return?
-Anwar
5th June 09








