Wednesday, March 31, 2010

मुन्नी इस्कूल जाएगी . . .

मै ना जानु पढ़ना लिखना,
लेकिन मुन्नी को हे पढ़ना,
अच्छी शिक्षा पाएगी
जब मुन्नी इस्कूल जाएगी . . .

रोज मजूरी कितनी मिलती,
मै ना जानु कोई गिनती
वो मुझसे गिनवाएगी
जब मुन्नी इस्कूल जाएगी . . .

दूर कभी चिठ्ठी हो देनी
मेरी बात लिखेगी मुन्नी
ख़त मे वो छाजाएगी
जब मुन्नी इस्कूल जाएगी . . .

हर मुश्किल से उसको लढना
कुछ भी हो आगे हे बढ़ना
अच्छे नंबर लाएगी
जब मुन्नी इस्कूल जाएगी . . .

जीवन कटा हे सहेते सहेते
थोडा हसते थोडा रोते
वो गीत खुशीके गाएगी
जब मुन्नी इस्कूल जाएगी . . .

Monday, March 29, 2010

पोटा-पाण्यासाठी

गेले दीड वर्ष रोजगार हमी योजना हा विषय घेऊन निर्माण फेलोशिप अंतर्गत शिक्षण, काम चालू आहे. आपल्या देशातील सद्य परिस्थिती बघता अशा उपक्रमांची नितांत गरज आहे. ग्रामीण भागात राहून उत्पादक कार्य करायचे असेल तर पाणी हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. रोजगार हमीतून पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठीची पायाभून कामे करून या पाण्याच्या आधारे स्थानिक रोजगार निर्मिती व्हावी असा याचा उद्देश.

एका बाजूला हे काम चालू आहे. सरकारी योजना जशी चालते त्या कार्यक्षमतेनी ही देखील योजना चालू आहे. मधे विवेक सावंतांशी चर्चा करत असताना असा विषय निघाला की आजच्या सरकारी योजनेंमध्ये माणसाच्या बुद्धीला, उद्योजकतेला चालना मिळेल असे पैलू नसतात आणि त्यामुळे यात लोकांच्या बाजूने ओढा नाही दिसत. सरकार करेल तर आम्ही येवू असा एक भाव असतो. यातून मार्ग कसा काढायचा? माझ्या पायावर उभा राहण्यासाठी धडपड करण्याच्या वृत्तीला चालना मिळेल आणि अशा धडपड्या व्यक्तीला मदत म्हणून सरकार पाठीशी उभे असेल अशा योजना कशा बनवता येतील?

या चर्चेनंतर जमेल तिथे लोकांशी संवाद करत असताना अशी काही स्वयंरोजगाराची, उद्योजकतेची वेगळीच उदाहरणे बघायला मिळाली ती मांडण्याचा इथे प्रयत्न करत आहे.

पेठ नाशिक रस्त्यावर वाटेत एक घाट आहे. घाटातून परतत असताना एका बाईक वर भरपूर भंगार वाटावे असे सामान घेऊन जाताना एक माणूस दिसला. मला वाटलं जाऊन विचारवं की एवढे कुठे घेऊन जाताय, पण ते काही जमले नाही. थोडे पुढे एक मारुती चे छोटेसे देऊळ आहे. तिथे तो माणूस थांबला. मग मी ही थांबलो आणि त्याच्याशी गप्पा मारल्या... त्याचा विडियो खाली आहे. यात बहुतेक गोष्टी आलेल्या आहेत. 

Saturday, March 27, 2010

माझे मत


हे माझे मत आहे. आपली लोकशाही आहे म्हणून हे मांडत आहे.
धान्यापासून मद्य निर्मिती चे कारखाने हे शेतकर्‍यांना लाभ होण्यासाठी उघडलेले नाहीत. आपणंच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी स्व:चे खिसे भरण्यासाठी, वैयक्तिक लाभासाठी हे कारखाने सुरू केले आहेत. लोकशाही व्यवस्थेत लोकप्रतिनिधींना दिलेल्या अधिकाराचा हा गैरवापर आहे असे मला वाटते. लोकशाहीचा रूपांतर धंद्यात होत चालल्याचे हे द्योतक आहे. सर्व जनतेनी भरलेल्या करातून स्वत:चे खिसे भरण्याचा हा प्रयत्न आहे.
ग्रामीण भागातील शेतकर्‍याचे जीवन कठीण आहे. पाऊस अनियमित आहे. पर्यावरणातील बदलामुळे पावसाची अनिश्चिती वाढत आहे. यासाठी मद्य निर्मिती हा मार्ग नाही. राळेगण सिद्धी मध्ये 30 वर्षापूर्वी 25 दारूचे गुत्ते होते. आज या गावाची परिस्थिती आपण जाणतो. ही प्रगती याच दारूच्या गुत्त्यांमुळे आहे असा गैरसमज मद्याच्या आधारे प्रगती होईल असे मानणार्‍यांचा होऊ शकतो. परंतु हे 25 गुत्ते बंद करून पाणी व्यवस्थापनाचे काम या गावानी केले. यातून पावसाच्या पाण्याच्या अनियमिततेवर या गावानी मात केली. पूर्ण महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस म्हणजे 30 ते 40 से.मी. पाऊस पडणार्‍या प्रदेशातले हे गाव आहे. जर या गावाला हे शक्य झाले तर इतर गावांना का नाही होणार. आज महाराष्ट्रातील अनेक समृद्ध गावांच्या प्रगतीचे हेच कारण आहे. जसे की
* म्हसवंडी (जि. अहमदनगर)
* हिवरेबाजार (जि अहमदनगर)
* पारडा (ता. जि. हिंगोली)
* पारडी (ता. आसरा, जि. वाशिम)
* खापरी (ता. हिंगणघाट जि. वर्धा)
* पुसेगाव (जि. सातारा)
* निढळ (ता.खटाव जि. सातारा)
* लोधवडे (जि. सातारा.)
* घाटपिंप्री (जि. उस्मानाबाद)
* बोरकरवाडी (ता. बारामती, जि. पुणे)
* टाकळी बंधारा (ता. हिमायतनगर, जि. नांदेड)
या गावांकडून शिकून पाण्याचे व्यवस्थापन केल्यामुळे पावसाच्या अनियमिततेवर मात करणे शक्य आहे. ही आपल्या कार्यासाठीची दिशा असावी असे मला वाटते. मद्य नको, पाण्याचे व्यवस्थापन हवे!
ही योजना आपल्या आजारी लोकशाहीचे लक्षण आहे. लोकशाही व्यवस्थेत लोकांच्या, माझ्या असहभागाचे प्रतीक आहे. लोकशाहीचे रुपांतर धंद्यात झाल्याची खूण आहे. ही योजना आपल्यातील मानवी स्वार्थाने मर्यादे पलीकडे गेल्याचे द्योतक आहे. म्हणून माझा याला विरोध आहे.
विरोध धान्यापसून मद्य निर्मितीचा... शोध बळकट लोकशाही व योग्य लोक प्रतिनिधींचा !!
सलग  समतल चर खणून पाण्याचे उत्तम व्यवस्थापन करता येते. उतारावरचे पाणी आडवून, गती कमी करून जिरवणे हे याच्यामुळे शक्य होते. असे केल्यामुळे पाणी जमिनीखालून वाहते आणि पाऊस संपल्यानंतरही उपलब्ध होते. हे पाणी व्यवस्थापनाचे उत्तम तंत्र आहे. अशा सारख्या इतर अनेक उपाययोजना आहेत व त्यांचा योग्य वापर केल्यास पाण्याचे उत्तम नियोजन करता येते. 
सलग समतल चरांमध्ये आडलेले पाणी 
चरांमध्ये झाडे लावण्याचे शास्त्रशुद्ध तंत्र आहे. तशी झाडे लावल्यास त्यांची जगण्याची शक्यता वाढते 


गावा मागच्या  डोंगरात सलग समतल चर केले आहे. त्यामुळे उपलब्ध झालेल्या पाण्याच्या आधारे केलेकी शेती दिसत आहे. हा पावसाळ्यानंतरचा काळ आहे.













-प्रियदर्शन 

Thursday, March 25, 2010

Subsidy Aali

सब्सिडी आली
(चाल: अप्सरा आली)

म्हणे शेतीची दैना
पाहावेना नयना
योजना काढली भारी

ऊसही ‘मळ’ले
द्राक्षही पिळले
वापरु मका अन ज्वारी

सर्व मिळुनी साव
रचिला डाव
पैशाची मोठी हाव

कसा मिळेल राव
ज्वारीला भाव
मंत्रीच मारतील ताव

सब्सिडी आली...
सरकारी खिशातून
दारु निघाली...
ज्वारीच्या कणसातून
तिजोरी भरली...
मंत्र्यांची पैशातून
शेतकरीन रडली...
उपाशी पोटातून
SSS

- अमृत बंग

Wednesday, March 3, 2010

German Bakery

They smile through the massacre
I look on, numbed by the shock.
They see death, coercion, Justice
I see nothing; I’m still in trauma you see?
They move on, planning another
I move on, forget.

‘Life goes on. Time heals all wounds.
Turn a blind eye.’
Bad clichés. Bad clichés.

Them. Me.
Blood-lust vs. apathy,
Hate and indifference.
They watch, and I watch.
Tell me then,
what is the difference?

‘Walk a mile in a victim’s shoes. My heart,
it bleeds for you. A penny for your thoughts?’
Good clichés. Good.

I can remember. Everything, always.
I can -
Hurt. Talk. Feel. Write.

They are willing to die for their cause,
I can at least live for mine -
Be alive. Be human.

-Mukta Patil