Saturday, March 27, 2010

माझे मत


हे माझे मत आहे. आपली लोकशाही आहे म्हणून हे मांडत आहे.
धान्यापासून मद्य निर्मिती चे कारखाने हे शेतकर्‍यांना लाभ होण्यासाठी उघडलेले नाहीत. आपणंच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी स्व:चे खिसे भरण्यासाठी, वैयक्तिक लाभासाठी हे कारखाने सुरू केले आहेत. लोकशाही व्यवस्थेत लोकप्रतिनिधींना दिलेल्या अधिकाराचा हा गैरवापर आहे असे मला वाटते. लोकशाहीचा रूपांतर धंद्यात होत चालल्याचे हे द्योतक आहे. सर्व जनतेनी भरलेल्या करातून स्वत:चे खिसे भरण्याचा हा प्रयत्न आहे.
ग्रामीण भागातील शेतकर्‍याचे जीवन कठीण आहे. पाऊस अनियमित आहे. पर्यावरणातील बदलामुळे पावसाची अनिश्चिती वाढत आहे. यासाठी मद्य निर्मिती हा मार्ग नाही. राळेगण सिद्धी मध्ये 30 वर्षापूर्वी 25 दारूचे गुत्ते होते. आज या गावाची परिस्थिती आपण जाणतो. ही प्रगती याच दारूच्या गुत्त्यांमुळे आहे असा गैरसमज मद्याच्या आधारे प्रगती होईल असे मानणार्‍यांचा होऊ शकतो. परंतु हे 25 गुत्ते बंद करून पाणी व्यवस्थापनाचे काम या गावानी केले. यातून पावसाच्या पाण्याच्या अनियमिततेवर या गावानी मात केली. पूर्ण महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस म्हणजे 30 ते 40 से.मी. पाऊस पडणार्‍या प्रदेशातले हे गाव आहे. जर या गावाला हे शक्य झाले तर इतर गावांना का नाही होणार. आज महाराष्ट्रातील अनेक समृद्ध गावांच्या प्रगतीचे हेच कारण आहे. जसे की
* म्हसवंडी (जि. अहमदनगर)
* हिवरेबाजार (जि अहमदनगर)
* पारडा (ता. जि. हिंगोली)
* पारडी (ता. आसरा, जि. वाशिम)
* खापरी (ता. हिंगणघाट जि. वर्धा)
* पुसेगाव (जि. सातारा)
* निढळ (ता.खटाव जि. सातारा)
* लोधवडे (जि. सातारा.)
* घाटपिंप्री (जि. उस्मानाबाद)
* बोरकरवाडी (ता. बारामती, जि. पुणे)
* टाकळी बंधारा (ता. हिमायतनगर, जि. नांदेड)
या गावांकडून शिकून पाण्याचे व्यवस्थापन केल्यामुळे पावसाच्या अनियमिततेवर मात करणे शक्य आहे. ही आपल्या कार्यासाठीची दिशा असावी असे मला वाटते. मद्य नको, पाण्याचे व्यवस्थापन हवे!
ही योजना आपल्या आजारी लोकशाहीचे लक्षण आहे. लोकशाही व्यवस्थेत लोकांच्या, माझ्या असहभागाचे प्रतीक आहे. लोकशाहीचे रुपांतर धंद्यात झाल्याची खूण आहे. ही योजना आपल्यातील मानवी स्वार्थाने मर्यादे पलीकडे गेल्याचे द्योतक आहे. म्हणून माझा याला विरोध आहे.
विरोध धान्यापसून मद्य निर्मितीचा... शोध बळकट लोकशाही व योग्य लोक प्रतिनिधींचा !!
सलग  समतल चर खणून पाण्याचे उत्तम व्यवस्थापन करता येते. उतारावरचे पाणी आडवून, गती कमी करून जिरवणे हे याच्यामुळे शक्य होते. असे केल्यामुळे पाणी जमिनीखालून वाहते आणि पाऊस संपल्यानंतरही उपलब्ध होते. हे पाणी व्यवस्थापनाचे उत्तम तंत्र आहे. अशा सारख्या इतर अनेक उपाययोजना आहेत व त्यांचा योग्य वापर केल्यास पाण्याचे उत्तम नियोजन करता येते. 
सलग समतल चरांमध्ये आडलेले पाणी 
चरांमध्ये झाडे लावण्याचे शास्त्रशुद्ध तंत्र आहे. तशी झाडे लावल्यास त्यांची जगण्याची शक्यता वाढते 


गावा मागच्या  डोंगरात सलग समतल चर केले आहे. त्यामुळे उपलब्ध झालेल्या पाण्याच्या आधारे केलेकी शेती दिसत आहे. हा पावसाळ्यानंतरचा काळ आहे.













-प्रियदर्शन 

2 comments:

Smita said...

Priyadarshan,
Thanks for posting this one. The pics are nice. Lets say about Maharashtra before India, From last 8-10 months i was thinking about the main cause behind rural poverty. And it is only one thing that lack of 'Water,Water and Water..' But confusing thing is why such work happens only in 10-15 villages and essence blows away after that..Why not it changes all the villages in Maharashtra?..And if not what can be done to change every village, aware of irrigation?
May be the villages need leadership? Nirmaan is a great platform for it but such people should be generated from the most remote village itsself and then it might be sustainable..
About alcohol from food, it is a great initiative by Nirmaan..
Thanks

Priyadarshan Sahasrabuddhe said...

@स्मिता,

तू म्हणत आहेस ते आपल्यासमोरचे आव्हान आहे. की या काही मोजक्या गावांनी केलेला विचार इतरत्र कसा पसरवायचा. सामाजिक परिस्थिती, योग्य नेतृत्त्व, राजकीय इच्छाशकती, योग्य शिक्षण, रोजगार हमी योजनेसारखी योजना.. असे अनेकानेक मार्ग असू शकतील... त्यापैकी रोजगार हमीमधून पाणी व्यवस्थापन कसे परिणामकारकपणे करता येईल असा प्रयत्न मी करत आहे.